शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

रब्बीवर दुष्काळाचे सावट; साताऱ्यात सव्वा लाख हेक्टरवर पेर, पेरणी किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: November 23, 2023 6:52 PM

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर ...

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर महिना उजाडत आलातरी वेग नसल्याने आतापर्यंत ५३ टक्के म्हणजे १ लाख १३ हजार हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. तर भविष्यात पाणी कमी पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांत पेरणीबद्दल धाकधूक कायम आहे.जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. सध्यस्थितीत १ लाख हेक्टरवर ऊस राहतो. त्यामुळेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचीही संख्या वाढत चालली आहे. तरीही जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे प्रमुख दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे २ लाख १३ हजार २४४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. सध्या रब्बीच्या हंगामावर दुष्काळाचे सावट गडद आहे. कारण, या हंगामातील सर्वाधिक क्षेत्र हे दुष्काळी तालुक्यात अधिक राहते. यामध्ये माण तालुक्यात ४६ हजार ४१८ हेक्टर असून फलटणला सुमारे ३१ हजार, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६, सातारा तालुका १४ हजार ९७०, खंडाळा १४ हजार हेक्टर, पाटण १७ हजार ८०९, कऱ्हाड १४ हजार ७३२, जावळी ८ हजार हेक्टर, वाई १४ हजार ६८९ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६४५ हेक्टर क्षेत्र आहे. पण, यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात तरी रब्बीच्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती आहे. या तालुक्यांत यावर्षी सरासरीच्या ५० ते ६५ टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरणी केलीतर पुढे पिकांना पाणी मिळणार का ? याची शास्वती नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे धाडस करत नाहीत.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हे प्रमाण ५३.११ टक्के इतके आहे. यामध्ये माण तालुक्यात सुमारे ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खटावमध्ये ६५ टक्के, सातारा ७४, जावळी ३८, पाटण ७० टक्के, कऱ्हाड २१, कोरेगाव ६०, फलटण ३९, खंडाळा ३८, वाई तालुक्यात ४५ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. या आकडेवारीवरुन दुष्काळी तालुक्याततरी १०० टक्के पेरणी होणार का याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

ज्वारीची ८८ हजार हेक्टरवर पेरणी..जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात ८८ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्यातच ज्वारीची पेरणी आॅक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या काही दिवसांत करण्यात येते. पाऊस कमी असल्याने यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. कारण, ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र माणमध्ये ३८ हजार ५३४ हेक्टर आहे. येथे २४ हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली. यापुढे ज्वारीची पेरणी होणार नाही. तर खटावला २० हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी सुमारे १४ हजार हेक्टरवर पेर आहे. कोरेगावमध्ये १० हजार ६९४ आणि फलटण तालुक्यात ८ हजार ४१३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसाळ्यातच असतो. पण, यंदा जून आणि जुलैमध्येही पाऊस कमी पडला. त्यामुळे याचा परिणाम पेरणीवर झाला. खरीप पेरणी ९३ टक्केच झाली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र हे नापेर राहिले होते. यामध्ये बाजरीचे क्षेत्र सर्वाधिक होते. पण, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली.

ओढे काेरडे, विहिरींचा तळ..रब्बी हंगाम प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यातच मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. पण, या तालुक्यातील बहुतांशी ओढे काेरडे पडलेले आहे. विहिरींनी तळ गाठलेला आहे. यामुळे शेतकरी पेरणी करण्यास कचरत आहेत. आता पेरणी केलीतर जानेवारीपासून पिकांना पाणी मिळणे अवघड होऊन जाणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ