शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, ६ तालुक्यांत गारपीट; ५१ गावांना फटका

By नितीन काळेल | Published: April 17, 2023 8:58 PM

अवकाळीचा घात लाखांत, वळवाचा ७ कोटींत, वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे.

सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आताच्या वळवाच्या तडाख्याचाही शेकडो बळीराजाला फटका बसलाय. अवघ्या आठवड्यातच ६ तालुक्यांत गारपीट झाली असून ५१ गावे बाधित आहेत. यामध्ये ३५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असेलतरी फळबागांची हानी अधिक आहे. त्यामुळे अवकाळीत लाखांत असलीतरी आता ७ कोटींवर हानी झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात नुकसान झाले होते. सर्वाधिक नुकसान हे वाई तालुक्यात झाले होते. वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे २२० हेक्टर होते, तर याचा फटका १,१९७ शेतकऱ्यांना बसलेला. महाबळेश्वर तालुक्यात ६४ हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे २४० बळीराजांचे नुकसान झाले होते. तर माण तालुक्यात १९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि ११ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला. माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे ३० हेक्टर, तर ६० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हाेते. यामधून शेतकरी सावरत असतानाच आठ दिवसांपासून वळवाचा तडाखा जिल्ह्यात बसत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे पुन्हा मोडले आहे.

जिल्ह्यात ७ एप्रिलला जोरदार वारे आणि वळवाचा पाऊस व गारपीट झाली होती. तर मागील चार दिवसांतही जिल्ह्यात पाऊस झाला आहे. यामध्ये गारपीटच अधिक होती. याचा फटका शेती पिकाला कमी बसलेला आहे. मात्र, फळबागांचे नुकसान अधिक झालेले आहे. जिल्ह्यातील शेती क्षेत्राची नजरअंदाजे नुकसानीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आठवडाभरातील वळीव पाऊस आणि गारपिटीचा ३४६ हेक्टरला फटका बसलेला आहे. तर बाधित गावांची संख्या ५१ दिसून आलेली आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू असल्याने नुकसानीचा खरा आकडा लवकरच समोर येणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजे ७ कोटींहून अधिक नुकसान झालेले आहे.

वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये अधिक करुन द्राक्षबागांचेच नुकसान आहे. कोरेगाव तालुक्यातही गारपीट होऊन १८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातीलही ६ गावांना दणका बसला आहे. माण तालुक्यातील ४ गावांत गारपिट झाली. यामध्ये ४३ हेक्टरवरील बागा आणि पिकांना फटका बसलाय. महाबळेश्वर तालुक्यात ४८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. १७ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर खंडाळा तालुक्यात ६ गावे बाधित असून १० हेक्टरवरील पिके आणि बागांचे नुकसान झाले आहे. जावळीत ५ गावांतील ३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आता झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे पिके आणि फळबागांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवत आहोत. तर पंचनामे सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अवकाळीत ८६ लाख रुपयांचे नुकसान...

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला होता. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले होते. वाई तालुक्यात सर्वाधिक ५९ लाख ३२ हजारांचे नुकसान झालेले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात १७ लाख २८ हजार, तर माणमध्ये ९ लाख १४ हजारांचे नुकसान झाले होते.