शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मुख्यमंत्रिपदी शिंदेच, अजित पवारांना लवकर संधी नाही; रामदास आठवलेंचा दावा

By नितीन काळेल | Published: April 27, 2023 7:54 PM

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होऊन सत्ता मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला

सातारा : ‘अनेकांची इच्छा मुख्यमंत्री होण्याची असते. तसेच अजित पवारांनी व्यक्त केली. भाजपबरोबर ते आलेतरी त्यांना लवकर मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटत नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील,’ असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच टांगती तलवार शिंदे यांच्यावर नाहीतर उध्दव ठाकरे यांच्यावर असल्याचा दावाही त्यांनी केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले, ‘‘रिपाइं’चे अधिवेशन २८ मे रोजी शिर्डी येथे होणार आहे. देशातून ५० हजार कार्यकर्ते येतील असे नियोजन आहे. यामध्ये नागालॅंडमधील आमच्या पक्षाचे दोन आमदारही सहभागी होतील. देशात पक्षवाढीवर भर देण्यात येणार आहे. अधिवेशनात भूमिहीन कुटुंबांना पाच एकर जमीन द्यावी अशी आमची मागणी राहणार आहे. कारण, शहराकडे येणारे लोंढे थांबतील. गावातील माणूस गावातच राहील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील गावी आले होते. ते सुट्टीवर आले नव्हते. तर शेती पाहणे, कुटुंबाला भेटण्यासाठी आलेले असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे. तसाच सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल मेरीटवर लागेल. कारण, ७५ टक्के आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे आहेत. उध्दव ठाकरे यांनी आमदारांची कामेच केली नाहीत. कोरोना काळात त्यांना भेटलेही नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होऊन सत्ता मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे राहणार असतील तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लागल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर मंत्री आठवले यांनी अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आघाडी असताना राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते. तेव्हा त्यांना संधी होती. पण, मुख्यमंत्री होता आले नाही. शरद पवार यांच्या तालमीत अजित पवार तयार झालेले आहेत. ते आमच्या महायुतीत आलेतर आनंद आहे. पण, मुख्यमंत्री हे शिंदेच राहतील. कारण, अजित पवार यांना लवकर संधी मिळणार नाही, असे वाटते.

एकनाथ शिंदेंचे महाबंड; राऊतांच्या भूलथापा...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. पण, त्याप्रमाणात अधिक मते मिळत नव्हती. शिवसेनेत आतापर्यंत अनेकवेळा बंड झाले. पण, ते तेवढ्यापुरते मर्यादित होते. एकनाथ शिंदे यांचे हे महाबंड आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांच्या भूलथापांना बळी पडून उध्दव ठाकरे हे आघाडीत गेले, असा दावाही त्यांनी केला.

राज ठाकरेंनी स्वतंत्र राहणे फायद्याचे...मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास विरोध का ? या प्रश्नावर आठवले यांनी स्वतंत्र राहिल्यावर भाषण करण्याची संधी मिळते. ते त्यांच्या फायद्याचेच आहे. त्यांची आवश्यकता आम्हाला नाही. माझा पक्ष युतीत असताना ते नकोत, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार