शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

मोहनराव कदमांच्या भेटीने कार्यकर्ते भावूक

By admin | Published: November 14, 2016 11:44 PM

कवठेमहांकाळला बैठक : विधानपरिषद निवडणूक

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ -वेळ सायंकाळी साडेपाचची. कवठ्यात नगरपंचायतीचे वारे वाहू लागले असताना, जुन्या बसस्थानकावरून माणसांची ये-जा सुरू होती. काँग्रेसचे उमेदवारही दिवसभराचा प्रचार आटोपून काँग्रेस भवनात मतांची आकडेमोड करीत बसले होते. याचवेळी ज्येष्ठ नेते मोहनराव (दादा) कदम यांनी काँग्रेस भवनमध्ये अचानक प्रवेश केला आणि सगळेच अवाक् झाले. दादा आले आणि त्यावेळी बैठकीत रूपांतर कधी झाले, हे समजलेच नाही. बघता-बघता शेकडो कार्यकर्ते जमा झाले आणि दादांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. ‘हे बघा पोरांनो, मी राजकारणातील एक राजकीय मूर्तिकार म्हणून खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. या राजकारणात अनेक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर, सभापती, अध्यक्ष, राजकारणातील अनेक मातब्बर कार्यकर्ते, नेते घडविले आणि यात किती व कसा वेळ गेला समजलेच नाही. काम करीत राहिलो. खूप काम केले. काँग्रेस पक्षाने जी जी जबाबदारी आजवर दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. पण राजकारणातील रंगमंचावर मात्र मी उपेक्षितच राहिलोय रे! उपेक्षित हे समजायला अख्खे आयुष्य वेचावे लागले रे...’, असे म्हणत दादा खूपच भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि उपस्थित सर्वच शांत झाले.परत दादांनीच सर्वांना सावरत, ‘चालायचं राजकारणात’, म्हणत, ‘आपलं काम आहे जनतेची सेवा करायचं, ते करत राहायचं,’ म्हणत सुस्कारा सोडला. ‘बघू, आता माझी वेळ आली आहे. विधानपरिषदेसाठी सांगली, सातारामधून चांगला प्रतिसाद मिळतोय. माझ्यासारखा माणूस सर्वांना पाहिजे, अशी मतदारांची मागणी आहे. आजवर केलेल्या कामाची पोहोचपावती हे मतदार नक्की देतील. पक्ष बघणार नाहीत, माणूस बघतील’, असा विश्वासही दादांनी भावूक स्वरात व्यक्त केला. ‘सर्वत्र मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सगळ्यांनी मदत करण्याचं ठरवलं आहे. आजवर हा मोहनराव कदम सगळ्यांसाठी आधार झाला आहे. आता माझ्या लढाईत कोण-कोण साथ आणि सोबत राहतंय बघुया,’ असे सांगायला दादा विसरले नाहीत. जाता-जाता ते सगळ्यांनाच भावूक करून गेले.दादा असे सांगत असताना उपस्थित सर्वजण शांतपणे ऐकत होते. शेवटी दादांनीच निघण्याची परवानगी मागितली व त्यांच्या गाड्या सांगलीच्या दिशेने रवाना झाल्या.मोहनराव दादा गेल्यानंतर काँग्रेसची सर्वच मंडळी आणि उपस्थित कुजबुजू लागली. राजकारणात असा उदार मनाचा, खुल्या अंत:करणाचा माणूस होणार नाही. असा माणूस नक्कीच निवडून येईल, असा बोलबाला करीत सगळेजण परत प्रचाराला निघून गेले.यावेळी आप्पासाहेब शिंदे, सुरेश मोहिते, सतीश पाटील, बाळासाहेब गुरव, राजाराम घोरपडे, वैभव गुरव, दिलीप पाटील, चैतन्य पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ‘ कवठेमहांकाळ तालुका : माझे व्यक्तिगत संबंधकवठेमहांकाळ तालुक्याशी माझी पूर्वीपासून राजकीय, सामाजिक नाळ जोडली गेली आहे. माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे मला कवठेमहांकाळ तालुक्यातून नक्की मतदार न्याय देतील. मी आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात काम करीत असताना, माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांचा तसेच मदत मागणाऱ्या नेत्यांचा पक्ष बघितला नाही. येणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे कामे केली. नेत्यांनाही मदत केल्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही सर्व माणसे, नेते, कार्यकर्ते, मतदार माझ्या पाठीशी ढाल बनून थांबतील, असा विश्वास आहे’, असेही दादांनी सांगितले.