शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

मोबाईलचा अतिवापर मुलांसाठी ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:39 AM

कुडाळ : मोबाईल हे छोटेसे यंत्र आज सर्वांनाच निकडीची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुलांसह वयोवृद्धांपर्यंत शिक्षण आणि ...

कुडाळ : मोबाईल हे छोटेसे यंत्र आज सर्वांनाच निकडीची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुलांसह वयोवृद्धांपर्यंत शिक्षण आणि करमणुकीचे साधन बनला. मुलांना शालेय अभ्यास करताना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. त्यामुळे त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात शिक्षक वर्गालाही मदत झाली. मात्र, याचा अतिवापर हा आजच्या पिढीला घातक ठरू लागला आहे.

आजची पिढी ही आतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी आहे. परंतु ज्या वयात त्यांना मैदानाची गोडी लावायला हवी. अशा वयातच त्यांच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची किमया याला कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. अगदी लहान बाळापासूनच याची सुरुवात होत आहे. कळत न कळत या मोबाईलच्या हव्यासाची त्यांना सवय जडत आहे.

कोरोना काळात तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली. लहान-थोरांचे शिक्षण आणि काम याद्वारेच घरातून होत आहे. शिक्षकांनी मेहनत घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना याच माध्यमातून अध्ययनप्रवण ठेवण्याचे कार्य केले. पण विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने याचा उपयोग कितपत केला हेही महत्त्वाचे आहे. पालकांनी याकडे जाणीवपूर्वक पाहिले का? हा प्रश्न आहे. कारण मोबाईलवर शिकण्याबरोबरच अन्य विषयांकडे मुले भरकटली गेली असल्याचाही तक्रारी समोर आल्या आहेत.

ज्ञानाची कवाडे उघडून आवश्यक ते ज्ञान उपलब्ध होण्याकरिता या छोट्याशा मोबाईलची मोठी मदत होत आहे. मात्र, आजची लहान पिढी या मोबाईलमध्ये रममाण होत एकलकोंडी होऊ लागली आहे. पालकांनी योग्य दक्षता घेत मुलांच्या मोबाईल वेडाला वेळीच आळा घालायला हवा.

परस्पर संवाद महत्त्वाचा

परस्पर संवादातून मुलांची मानसिकता आणि खेळाच्या माध्यमातून शारीरिक सुदृढता राखण्यात मदत होईल. याकरिता आवश्यक वापराव्यतिरिक्त मुलांना मोबाईलपासून परावृत्त करण्याची भूमिका पालकांनी बजावायलाच हवी.