शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

हद्दपार झाला छकडा.. अन् कोपऱ्यात हातगाडा!

By admin | Published: November 29, 2015 11:31 PM

आधुनिकीकरणामुळे उपासमार : सातारा शहरात उरले फक्त चार गाडे

जावेद खान-- सातारा--स्वातंत्र्यपूर्व काळ आठवला तर त्यावेळी वाहतुकीच्या साधनांची फारशी सोय नव्हती. प्रवाशी वाहतुकीसाठी घोडागाडी अन् मालवाहतुकीसाठी हातगाड्या असायच्या. आता जमाना बदलला आहे. पूर्वी शान समजल्या जाणाऱ्या घोडागाड्या आता केवळ पर्यटनस्थळी रपेट मारण्यासाठी वापरल्या जात आहेत. आधुनिकीकरणामुळे छकडे हद्दपार झाले आहेत तर पूर्वी मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्याही कोपऱ्यात पडलेल्या पाहायला मिळत आहेत. ब्रिटिशकाळात साहित्यांची ने-आण करण्यासाठी हातगाडा, छकडा याशिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळातही हातगाडे, घोडागाडी बरीच वर्षे शहराच्या ठिकाणी पाहायला मिळत होती. मात्र वाहननिर्मिती क्षेत्रात वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी मालवाहतुकीबरोबरच प्रवाशी वाहतुकीच्या सोयीसाठी अनेक प्रकारची वाहने बाजारात आणली आहेत, ज्यामुळे काम सोपे झाले आहे. हातगाड्यांच्या जागी आता छोटी आधुनिक वाहने आली आहेत. त्यामुळे जुनी साधनं काळाच्या पडद्याआड चाललेली आहे.साताऱ्यात होते शेकडो हातगाडेब्रिटिशकाळापासून सातारच्या मुख्य बाजारपेठेत जवळपास शंभरहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्यांची संख्या होती. कामगार हातगाड्या, छकड्यांच्या साह्याने रात्रंदिवस काम करायचे. खासकरून बसस्थानक व रेल्वे स्थानकात हातगाडे दिसायचे. रोजगाराची ही मोठी केंद्रे असल्यामुळे मालवाहतूक करण्याची वर्दी हमखास मिळायची. कष्ट जास्त, मोबदला कमीसातारा शहराची भौगोलिक रचना चढ-उताराची आहे. अशा भागात हातगाडी चालविणे मोठे कष्टाचे असते. मात्र कष्टाच्या बदल्यात मिळणारा मोबदला फारच कमी असल्यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे अवघड असल्याचे चाळीस वर्षांपासून हातगाडा ओढण्याचे काम करणारे आनंद दोरके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बिले, परवाने देणे बंदपूर्वी वाहतूक शाखेकडून हातगाडाधारकांना बिले दिली जायची. त्याच्या नूतनीकरणाचा कालावधी २-३ वर्र्षाचा कालावधी होता. २० ते ३० रूपयांत हे नूतनीकरण होत होते. १९९५-९६ मध्ये हातगाड्यांचे शेवटचे नूतनीकरण झाले. तेव्हापासून बिले, परवाने देणे बंद झाले आहे.हातगाड्यांना अजूनही मागणीजवळची मालवाहतूक करण्यासाठी अजून हातगाड्यांना मागणी आहे. सातारा शहरात मजूर अड्ड्यावर काही हातगाडे पाहायला मिळतात. भाजीपाला, नारळाची पोती, गाद्या, टिकाऊ वस्तंूचे बॉक्स, बांधकामाचे स्टील, कपाटे अशा वस्तू दुकानातून घरापर्यंत नेण्यासाठी हातगाड्यांचा वापर होताना दिसतो. तसेच गोडावूनमधील माल दुकानापर्यंत नेण्यासाठीही हातगाडी वापरली जाते. कमी पैशात ही वाहतूक होत असल्याने आजही त्याला मागणी आहे.