शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

सातारा: ..त्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, खटावमध्ये स्वाभिमानीने आंदोलनाचे फुंकले रणशिंग

By प्रशांत कोळी | Published: October 28, 2022 4:44 PM

जिल्ह्यातील इतर कारखाने तीन हजारांच्या आसपास दर देत असताना खटावमध्ये मात्र हा दर रेंगाळला

वडूज : गेल्या गाळप हंगामातील उर्वरित दोनशे रुपये आणि चालू गाळप हंगामातील एकरकमी एफआरपीची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही कारखाने सरळ चालू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. पेडगाव (ता. खटाव) येथे संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊसदराच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले.दोन-तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गोपूज ग्रीन पावर शुगर, पडळ येथील खटाव- माण शुगर आणि वर्धनी शुगर या कारखान्याच्या व्यवस्थापनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र कुणीही पहिल्या उचलीची घोषणा केली नाही, त्यामुळे संघटना संतप्त झाली आहे. आता संघर्ष अटळ असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी म्हटले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, ‘जिल्ह्यातील इतर कारखाने तीन हजारांच्या आसपास दर देत असताना खटावमध्ये मात्र हा दर २५०० रुपयांच्या आसपास रेंगाळला आहे. तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे यांनी ऊस हंगाम संपल्या नंतर १२० दिवसांत सर्व हिशोब साखर आयुक्तालयास सादर करणे या कायद्याने बंधनकारक आहे. मात्र याबाबतही कारखान्यांनी कुठलीही हालचाल केली नसल्याची माहिती दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकते याची जाणीव झाल्यामुळेच संघटनेमध्ये प्रवेश करत असल्याचे राजू फडतरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेळेला पेडगावमधील दहा ते पंधरा युवकांनी संघटनेमध्ये प्रवेश करून उत्पादकांच्या या लढ्याला बळ देण्याचे जाहीर केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना