शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

खोट्या तक्रारी देणाऱ्यांना शिक्षेसाठी वेगळा कायदा करा

By admin | Published: October 18, 2016 10:34 PM

अशोक गायकवाड : अ‍ॅट्रॉसिटी हे मागसवर्गीयांचे कवचकुंडल

सातारा : ‘अ‍ॅट्रॉसिटी हा कायदा मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले हे कवच असून, हा कायदा रद्द झाल्यास मागासवर्गीयांवर अत्याचार वाढतील. याचा गैरवापर होतो हे मान्य असून, खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळा कायदा निर्माण करावा,’ अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी दि. १४ नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक लागल्याने आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेत मोर्चा काढता येत नसल्याने मोर्चासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे रितसर अशी परवानगी मागण्यात आली आहे.गायकवाड म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या अथवा जाती-धर्माच्या विरोधात नसून बहुजनांच्या समस्यांसाठी आहे. यासाठी विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, तालुकास्तरीय कमिट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तर संयोजन समिती तयार करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे.मोर्चाच्या तयारीासाठी ग्रामीण भागात जोरात तयारी सुरू आहे. हा मोर्चा पक्षविरहित असून, आपण व कार्यकर्ते एक बहुजन म्हणून मोर्चात सामील होणार आहे, असेही यावेळी अशोक गायकवाड म्हणाले. (प्रतिनिधी)