शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:42 AM

वरकुटे-मलवडी : शेती पिकवण्यासाठी अनेक वर्षांपासून रासायनिक खताचा बेसुमार वापर केला जात असल्याने, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास ...

वरकुटे-मलवडी : शेती पिकवण्यासाठी अनेक वर्षांपासून रासायनिक खताचा बेसुमार वापर केला जात असल्याने, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकरी आता शेणखताकडे वळले आहेत. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे प्रगतशील शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केल्यामुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एक ब्रास शेणखताच्या ट्रॉलीला सहा हजारांहून जास्त दर मोजावा लागत आहे.

सेंद्रिय शेतीसाठी शेणखत हे गाई-म्हशींचे शेण, मलमूत्र, गोठ्यातील पालापाचोळा यापासून तयार होते. त्यामुळे त्यात नत्र, स्फुरद, पालाश असे घटक समाविष्ट असतात. सेंद्रियखत हे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी व सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढविण्यासाठी कुजलेले शेणखत अत्यंत फायदेशीर ठरते. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मामध्ये लक्षणीय बदल होतात. विषमुक्त शेती आणि रोगमुक्त अन्न मिळविण्यासाठी काही प्रमाणात शेतकरी आता शेणखताचा वापर करू लागले आहेत.

माहिती तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर वाढला होता. त्यामुळे शेतीची मोठ्या प्रमाणात हानी होऊन त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. ग्रामीण भागातही पशुधनांची संख्या कमी झाल्याने, शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही शेतकरी पशुधन असलेल्या शेतकऱ्यांकडे अगोदरच शेणखताची मागणी नोंदवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातीलच नव्हे; तर प्रयोगशील शेतकरीही शेणखताचा वापर करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

शेणखताचा वापर करून घेतलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत मागणी असून, दरही चांगला मिळत आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे विनाकारण पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचबरोबर जमिनीचा पोत खराब होतो. जमिनीवर क्षार जमा होऊन शेती नापीक बनते. याशिवाय, रासायनिक खतातील १० टक्केच अन्नद्रव्य पिकाला मिळतात. सूर्याच्या उष्णतेमुळे उर्वरित अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो. रासायनिक खते जमिनीतील उपयोगी जीवाणूंना अपायकारक ठरतात. त्यामुळे शेतातील जमिनीवर मोठा परिणाम होतो. सध्या रासायनिक खताच्या दरात वाढ झाली आहे.

ट्रॉलीसाठी सहा हजार रुपये

साधारणतः ५० किलोच्या रासायनिक खताची गोणी १२५० रुपयांपासून मिळते. दुसरीकडे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीभर शेणखतासाठी सहा हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. शेणखत शेतीसाठी सर्वाधिक उपयुक्त असल्यानेे प्रयोगशील आणि अभ्यासू शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

कोट :

शेणखतामुळे जमीन सुपीक होते. नत्राचा पुरवठा वाढतो. कॅल्शियम, मॅग्नेशिअम, झिंक, फॉस्फरस, स्फुरद, बोरॉन, गंधक अशी सूक्ष्म मूलद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. याशिवाय, नत्र, स्फुरद, पालाश हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. माती भुसभुशीत होऊन हवा, पाण्याचे वहन झाल्याने जमिनीची सुपिकता चांगली वाढते.

अशोक शिंगाडे,

कृषी पर्यवेक्षक.