शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

दूध व्यवसाय डबघाईला शेतकरी हताश : दर नाही, एका गायीमागे दररोज पाचशे रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:11 IST

वाठार निंबाळकर : दूध दर ढासळल्याने दूध उत्पादक शेतकरी हताश व शासनावर संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. फलटण तालुक्यात शेतीला पूरक जोड धंदा म्हणून तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकरी यांनी नोकरी मिळत नाही म्हणून शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला असून, आज फलटण तालुक्यात गाय, म्हैसवर्गीय ८७९६३ जनावरे, तर शेळी, मेंढ्या ...

वाठार निंबाळकर : दूध दर ढासळल्याने दूध उत्पादक शेतकरी हताश व शासनावर संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. फलटण तालुक्यात शेतीला पूरक जोड धंदा म्हणून तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकरी यांनी नोकरी मिळत नाही म्हणून शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला असून, आज फलटण तालुक्यात गाय, म्हैसवर्गीय ८७९६३ जनावरे, तर शेळी, मेंढ्या १ लाख ११ हजार इतकी जनावरे फलटण तालुक्यात आहेत.

गेल्या तीन वर्षांपूर्वी हा दूध व्यवसाय अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू होता. लिटरला २८ रुपये इतका दर होता. मात्र सध्याचा दर १८ रुपये प्रति लिटर इतका मिळत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, वैरणीचे दर शेकडा २५०० रुपये ४००० रुपयांपर्यंत आहेत. तर ओला मका शेतात जागेवर ३५०० रुपये ते ४००० रुपये अडीच गुंठे इतक्या दराने घ्यावे लागत आहे. तर पशुखाद्य ५९ किलोसाठी १२०० ते १४०० रुयपे दराने भुसा ४९ किलोसाठी १०० ते १३०० रुपये दराने घ्यावे लागत आहे.

दुधाऱ्या गायीसाठी प्रतिदिन कमीत कमी २५ किलो ओला व सुका चारा लागतो. त्यासाठी १७५ रुपये पेंड पशुखाद्य ५ किलो त्यासाठी १२० रुपये भुसा ४ किलो, १०८ रुपये असा एका गायीसाठी दररोज ४०३ रुपये प्रतिदिन खर्च येतो. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात येत असून, पावसाळ्यामध्ये ओला चारा मुबलक असल्याने चाºयाचे दर कमी असतात.

सध्या दूध दर १८ रुपये मिळत असून, काही ठिकाणी १९ रुपये मिळत आहे. एका गायीचे दोन वेळचे २० लिटर दूध मिळाले तरी ३६० ते ३८० रुपये मिळाला जात आहे. परिणामी २३ ते ३३ रुपये प्रतिदिन तोटा शेतकºयांना सोसावा लागत आहे. चाºयाचे, आजार टॉनिक, कॅलशियम आदींचा खर्च वेगळा होत आहे. 

दुधाला दर १८ रुपये पाण्याचाी बाटली २० रुपये आहे. ही इतकी गंभीर परिस्थिती झाली आहे. रोज ३० ते ३५ रुपये तोटा एका गायीमागे होत आहे. शासनाने उसाप्रमाणे दुधालाही ३४ ते ३५ रुपये इतका हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.- दादासाहेब निंबाळकर, शेतकरी, तावडीनोकरी, मालाला दर नाही; मग कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? तरुणांनी डेअरीमार्फत उचली घेऊन गायी घेतो. त्या गायींना विकताना किमी पैसे मिळतात. मग डेअरीचे पैसे द्याचे कस? अशी अवस्था आहे.- नामदेव काळे, शेतकरी, मिरढेगेल्या तीन वर्षांपूर्वी २८ रुपये दर होता. त्यामुळे कुटुंब उत्तम पद्धतीने चालविता येत होते. आता मात्र जनावरांचे भागत नाही तर घर कसे चालवायचे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- अरुण ननावरे, धुळदेव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmilkदूध