शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Satara: नीरा कालव्याचे पाणी पेटले; फलटणला शेतकरी एकवटले!; आवर्तन सुरू करण्यासाठी काढला विराट मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 11:57 IST

माळशिरस, सांगोला, फलटणमधील शेतकरी आक्रमक

फलटण (सातारा) : नीरा उजवा कालव्यातील पाण्यावरून माळशिरस, सांगोला आणि फलटण येथील शेतकरी आक्रमक झाले असून, तिन्ही तालुक्यांतील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी फलटण येथील उपअभियंता नीरा उजवा कालवा कार्यालयावर विराट मोर्चा काढला. शेतीसाठी आवर्तन पुन्हा सुरू केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार करीत आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी उपअभियंता यांना देण्यात आले.नीरा कालव्याचे आवर्तन अचानक बंद करण्यात आल्याने तिन्ही तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. आवर्तन पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळपासूनच शेतकरी नीरा कालवा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमू लागले. हळूहळू ही गर्दी वाढत गेली. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व राजकीय हस्तक्षेपामुळे आवर्तन बंद करण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.कालवा सुरू करताना कालवा सल्लागार समितीतील सदस्यांना सांगता, मग बंद करताना कोणाला विचारून बंद केला, असा सवाल रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांना दि. १९ मेपर्यंतची मुदत देत आवर्तन पूर्ण करून मग उर्वरित कामे मार्गी लावावीत, अन्यथा याहीपेक्षा मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आमदार दीपक चव्हाण यांनी चोवीस तासांत दुरुस्तीचे काम करून पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.दुरुस्तीसाठी कालवा बंदनीरा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कालवा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नीरा उजवा कालव्याचा विसर्ग पूर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता आहे. कालव्यालगत असलेल्या लोकवस्तीत पाणी शिरून वित्त व जीवितहानी होऊ शकते, अशी माहिती नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.हक्कभंग आणूकालवा दुरुस्तीच्या कामी कोणती यंत्रणा सक्रिय आहे, असे रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी विचारले असता, दोन पोकलँड व दोन जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र शेतकऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तिथे केवळ दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी आढळून आला. यावरून रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकारी जनतेसमोर खोटी माहिती देत असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणWaterपाणीFarmerशेतकरीagitationआंदोलन