शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा!, 'स्वाभिमानी' टाकणार आमदार, खासदारांच्या दारात कांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 4:18 PM

'शासनाने किमान हमीभाव तरी द्यावा'

रशीद शेखऔंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला होता. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळतील, या आशेने कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले. मध्यंतरीच्या काळात हवामानातील बदलामुळे कांदा पिकावर करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खर्च करून फवारण्या केल्या. मात्र दर नसल्याने कोण आवाज उठविणार याकडे लक्ष लागले आहे.कांद्याला प्रतिकिलो ७ ते ८ रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणेही अवघड झाले आहे. कांद्याला मिळत असलेल्या अल्पदरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी अल्पदराने होत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. अल्पदरामुळे कांदा ऐरणीत भरून ठेवायचा, विक्री करायचा तर दर येईपर्यंत तो टिकेल का, या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत.शेतकऱ्यांना कमी बाजारभावात सध्या नाइलाजास्तव कांदा द्यावा लागत आहे. कांदा लागण, भांगलन, फवारणी, उपटणे, काटणी या खर्चाचा हिशोब केला तर येथून पुढे कांदा करायचा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे शासनाने किमान हमीभाव तरी द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.आमदार, खासदारांच्या दारात कांदा टाकणारकांदा दराबाबतीत सत्ताधारी आमदार, खासदारांनी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते, तर विरोधी पक्षातील नेत्यांना आवाज उठविण्याची मोठी संधी होती; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची कोणाची तयारी दिसत नाही, त्यामुळे येत्या आठवड्यात जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या घरापुढे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कांदा टाकून आंदोलन करणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरonionकांदाFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना