शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

शेतकऱ्यांना जाणवेना उसाचा गोडवा

By admin | Published: December 23, 2014 9:34 PM

फलटण तालुक्यातील स्थिती : दराची घोषणा हवेत; कारखानदार चिडीचूप

फलटण : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले असताना ऊसदराचा प्रश्न मात्र अजूनही बाजूलाच राहिला आहे. कारखानदार उसाची पहिली उचल देण्यास तयार नसल्याने तालुक्यातील सर्वच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्यांच्या ऊसदराकडे नजरा लागून राहिल्या आहेत.शासन निर्णयानुसार ऊस गाळपासाठी गेल्यानंतर १४ दिवसांत उसाची ‘एफआरपी’प्रमाणे होणारी किंमत ऊसउत्पादकाला देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. दुसरीकडे साखरेचे दर प्रतिक्विंटल २३०० ते २४०० रुपयांपर्यंत कमी झाल्याने ‘एफआरपी’प्रमाणे होणारी उसाची किंमत देणे साखर कारखान्यांना शक्य होत नाही. त्याबाबत योग्य तोडगा काढण्याऐवजी साखर आयुक्त किंवा प्रशासनाने उसाचे पेमेंट केले नाही तर साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करून महसुली वसुलीप्रमाणे उसाचे पेमेंट करण्यासाठी साखर कारखान्यांना दमदाटी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य अथवा केंद्र शासन अद्याप तरी कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.उसाचे प्रचंड क्षेत्र अद्याप गाळपअभावी शिल्लक असल्याने संपूर्ण उसाचे गाळप कसे करणार, हा प्रश्न सर्वांसमोर आहे. ऊसउत्पादक शेतकरी उसाच्या तोडीसाठी प्रयत्नशील असतानाच आर्थिक संकटाचा विचार करून आणि शासनाचे ठाम धोरण नसल्याने अनेक साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम उशिरा सुरू केले आहेत. परिणामी उसाचे मोठे क्षेत्र गाळपाविना शिल्लक राहण्याची भीती जाणकारांमधून व्यक्त होत आहे.फलटण तालुक्यातील श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाकडील साखर उतारा ११.७२ टक्के धरून तोडणी वाहतूक खर्च ५०७ रुपये २२ पैसे वजा जाता २,२०७ रुपये ८२ पैसे प्रतिटन ‘एफआरपी’प्रमाणे रक्कम देणे या कारखान्याला बंधनकारक आहे. कारखान्याने आज अखेर ४८ हजार २२५ मे.टन उसाचे गाळप करून ४८ हजार ८०० साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. मात्र, कारखान्याने आतापर्यंत ऊसउत्पादकाला एक रुपयाही दिलेला नाही.दरम्यान, न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याने आतापर्यंत १ लाख ४२ हजार ६०० मे.टन उसाचे गाळप करून १ लाख ५२ हजार ६०० साखरपोत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.एफआरपीसाठी गतवर्षीचा साखर उतारा ११.३६ टक्क्यांप्रमाणे तोडणी वाहतूक खर्च ४९२ प्रतिटन वजा जाता २१३९ रुपये ५२ पैसे प्रतिटन ऊस उत्पादकाला देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तथापि, साखरेचे दर पडल्याने या कारखान्यानेही अद्याप उसाचे पेमेंट केलेले नाही.(प्रतिनिधी)दर द्या; अन्यथा आंदोलन : खोतऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात करून उसाचे उत्पादन काढले असल्याने आता साखरेचे दर पडल्याचे कारण देऊन उसाची वाजवी किंमत देण्यास टाळाटाळ करणे गैर व अवाजवी आहे. शासनाने वाट्टेल त्या मार्गाने तरतुदी करून ऊस उत्पादकाला १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे उसाची संपूर्ण रक्कम दिली पाहिजे; अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी धनंजय महामुलकर, नितीन यादव. अ‍ॅड. नरसिंह निकम आदी उपस्थित होते.