शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

शेतकऱ्यांना सात दिवस वीजपुरवठा हवाच

By admin | Published: November 23, 2014 8:40 PM

नितीन भरगुडे-पाटील : महावितरण कंपनीवर ताशेरे

खंडाळा : खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरण वाढत आहे. त्या उद्योगधंद्यांना मदत करणारी एजन्सी वीज कंपनी आहे का? शेतकऱ्यांना वीज देण्याबाबत दुजाभाव का? असा सवाल करीत तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग सात दिवस दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, तसे न झाल्यास रास्ता रोको करावा लागेल, असा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व तालुका पंचायत समितीचे सदस्य नितीन भरगुडे-पाटील यांनी दिला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर कंपनीच्या हिताकरिता खांब रोवले तर विरोध करून फौजदारी गुन्हे दाखल करू, असे बैठकीत ठणकावून सांगण्यात आले. तालुका पंचायत समितीच्या दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील सभागृहात पंचायत समितीचे पदाधिकारी व वीज कंपनीचे अधिकारी यांची बैठक सभापती रमेश धायगुडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, अनिरुद्ध गाढवे, दीपाली साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, गटविकास अधिकारी विलास साबळे आदी उपस्थित होते. वीज कंपनीचा भोंगळ कारभार आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावर बैठकीत चर्चा झाली. भरगुडे-पाटील म्हणाले, ‘तालुक्यातील शेतकऱ्यांनी औद्योगिकीकरणासाठी जमिनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी राहिल्या, त्यांना पुरेशी वीज मिळावी,अशी अपेक्षा आहे. तालुक्यात वीज उपलब्धतेबाबत समतोल ठेवावा आणि सोमवार ते रविवार अशी सलग सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज द्या; अन्यथा सभापती धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करावे लागेल, असा इशारा दिला.पाणीपुरवठा योजनांना चोवीस तास वीज मिळावी, अशी मागणी करीत बेंगरुटवाडी, हरळी येथे वीज कंपनीचे कर्मचारी विजेचा दोष काढण्यासाठी सहकार्य करीत नसल्याबाबत अनिरुद्ध गाढवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर सलग आठ तास वीज द्या, अशी मागणी केली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एम. कुलकर्णी म्हणाले, ‘२००३ मध्ये केंद्र शासनाने कायदा केला आहे. महावितरणसह अन्य कंपन्यांवर ऊर्जा आयोगाचे नियंत्रण असल्याने वीज भारनियमनामध्ये बदल करण्याचा अधिकार शासनाला नाही. विजेची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत आहे. त्यानुसार चार दिवस दिवसा व तीन रात्री वीज पुरवठ्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)