शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:24 AM

कोपर्डे हवेली : सध्या जिल्ह्यातील काही गावांतील पथदिव्यांची वीज जोडणी तोडल्याने गाव अंधारात आहेत. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची ...

कोपर्डे हवेली : सध्या जिल्ह्यातील काही गावांतील पथदिव्यांची वीज जोडणी तोडल्याने गाव अंधारात आहेत. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्थ व नियोजन विभागाचे अधिकारी, पदाधिकारी यांची असून, त्यांच्यावर गुन्हा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे कोपर्डे हवेलीच्या ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी कऱ्हाडचे तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा युवकचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, कऱ्हाड तालुका उपाध्यक्ष दादासोा चव्हाण, कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीचे सदस्य अमित पाटील, गुरुदत्त चव्हाण, पैलवान अक्षय चव्हाण आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अनेक गावांतील पथदिव्यांचे वीजवितरण कंपनीने बंद केल्याने गावे अंधारात आहेत. रात्री एखादी दुर्घटना घटना घडू शकते. त्याला जबाबदार कोण? आतापर्यंत ग्रामपंचायत बिले भरत होती. मागील सन २००२ ते २००३ पर्यंत जिल्हा परिषदेने हे बिल भरले नाही. जिल्हा परिषदेचा अर्थ व नियोजन विभाग देयकांची तरतूद करत असतो. याचे नियोजन का केले नाही. मागील आठवड्यात राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगातून पथदिव्यांचे बिल भरावे, असे परिपत्रक काढले आहे. मुळातच पंधराव्या वित्त आयोगातून केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या निधीपैकी ९० टक्के ग्रामपंचायतीस १० टक्के पंचायत समिती व जिल्हा परिषदेस दिला जातो. ग्रामपंचायतीस दिलेल्या निधीचा वापर कर्मचारी पगार, व्यवस्थापन आस्थापना खर्च सोडून इतर विकासकामांवर खर्च करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

(चौकट..)

पंधराव्या वित्त आयोगातील हप्तेच दिले नाहीत...

केंद्र शासनाकडून आलेल्या पंधराव्या वित्त आयोगाचे सर्व हप्ते ग्रामपंचायतीस दिले नाहीत. त्यामुळे या गोष्टीस जबाबदार कोण? पथदिवे बंद असल्याने अनेक दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती ई मेलद्वारे जिल्हाधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत.