शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अद्ययावत उद्याने टाकतायत साताऱ्याच्या वैभवात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:32 IST

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर घालणारी येथील उद्याने आता कात टाकू लागली आहेत. ...

सचिन काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या वैभवात भर घालणारी येथील उद्याने आता कात टाकू लागली आहेत. कल्याणी शाळेजवळील उद्यान महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक गार्डन म्हणून नावारुपास येत असताना शहरातील इतर उद्यानेही नगरपालिकेच्या वतीने अद्ययावत करण्यात आली आहेत. अनेक वर्षांनंतर उद्यानांचे रूप बदलल्याने सातारकरांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.सातारा शहरात सुमित्राराजे उद्यान, आयुर्वेदिक गार्डन, गुरुवार बाग, प्रतापसिंह उद्यान व हुतात्मा उद्यान ही पाच प्रमुख उद्याने आहेत. देखभाल व दुरुस्तीअभावी या उद्यानांना अवकळा लागली होती. त्यातील खेळणी गंजून गेली होती. तर कोणत्याच उद्यानात नव्याने वृक्षारोपणही करण्यात आले नव्हते. याबाबत नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात होती. या सर्व उद्यानांना आलेली अवकळा दूर करण्यासाठी आता सातारा पालिकेने पुढाकार घेतला असून, ही उद्याने कात टाकू लागली आहेत.अण्णासाहेब कल्याणी विद्यालयासमोर श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन साकारण्यात आले आहे. पंजाब राज्यातील सुनाम शहरातील हौसिंग गार्डनपासून प्रेरणा घेऊन सुमारे साडेतीन एकर विस्तीर्ण क्षेत्रावर हे वैशिष्ट्यपूर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे. उद्यानात २३५ मीटर लांबीचा चालण्यासाठी पेव्हर पाथ-वे बनवला आहे. याशिवाय या गार्डनमध्ये विविध व्याधींचे निवारण करणारे आठ ट्रिटमेंट पाथ-वे बनवले आहेत. महिलांसाठी ओपन जीम उभारण्यात आली आहे. अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलझाडांची पुष्पवाटिका या उद्यानात तयार करण्यात आली आहे.सुमित्राराजे उद्यानातही तीनशे मीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. याशिवाय जास्वंद, कर्दळ, रातराणी, सिंघोनिया अशी फुलझाडेही लावण्यात आली आहेत. बाळगोपाळांसाठी या बागेत नवीन खेळणीही बसविण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरुवार बागेचे नुकतेच अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या बागेत लॉन बसविण्यात आले असून, फुलझाडांची लागवडही करण्यात आली आहे. प्रतापसिंह उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, अर्कशाळेजवळील हुतात्मा उद्यान आबालवृद्धांना पर्वणी ठरत आहे. वॉकिंग ट्रॅक हा या बागेचे प्रमुख आकर्षण असून, पहाटे व सायंकाळी ही गर्दीने होत आहे.