शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

कोरोनाच्या महामारीत जिल्ह्यात पाचजणांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना लोक टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना लोक टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संशयित असल्याच्या कारण तसेच कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा घरगुती नैराश्यात त्याचबरोबर अन्य कारणांमुळे जिल्ह्यात पाच जणांनी विविध ठिकाणी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेनवडी, राजापूर तसेच सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी, सोनगावतर्फे सातारा तर कराड येये एक अशा पाच आत्महत्यांची नोंद झाली असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे.

खटाव तालुक्यातील शेनवडी येथील जाधव वस्तीमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय बाळासोा रामचंद्र जाधव यांनी घरगुती कारणातून आलेल्या नैराश्यातून दि. २० रोजी रात्री साडेदहा ते दि. २१ मे रोजी सकाळी सहा या वेळेत शेनवडी येथे राहत्या घराच्या समोर असणाऱ्या लाइटच्या खांबाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर श्रीमंत महादेव जाधव (वय ५२, रा. शेनवडी, रसाळ मळा, ता. खटाव) यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस हवालदार एस. बी. काळेल करत आहेत.

सातारा तालुक्यातील कण्हेरनजीक असणाऱ्या माळ्याचीवाडी येथेही ३८ वर्षीय नंदकुमार वामन केसरकर यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. नंदकुमार केसरकर यांना खोकला आणि अशक्तपणा असल्यामुळे राहत्या घराच्या बाजूला असणाऱ्या एका खोलीत त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांनी दि. २१ मे रोजी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर चंद्रकांत वामन केसरकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस नाईक हेमंत शिंदे करत आहे.

कराड येथील शनिवार पेठेत राहणाऱ्या परसू सैदाण्णा दरी (वय ३०, सध्या रा. दैत्यनिवारणी, शनिवार पेठ, कराड. मूळ रा. इजेरी, जबरगी, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) याने दि. २१ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाडाच्या फांदीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची खबर अरुण श्रीनिवास शिंगण (वय ३७, रा. दैत्यनिवारणी, जुन्या पुलाशेजारी, शनिवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

सातारा तालुक्यातील सोनगाव येथील ज्योत्सना सुबोध कांबळे (वय ३५, रा. सोनगाव तर्फे सातारा, ता. सातारा) यांनी राहत्या घरी असणाऱ्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, ज्योत्सना यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारास दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

आठ दिवसांपूर्वी विषारी औषधप्राशन केलेल्या खटाव तालुक्यातील राजापूर येथील गौरी आकाश मदने (वय १९) या विवाहितेचा दि. २० रोजी सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या आत्महत्येची नोंद दि. २१ रोजी पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. गौरी मदने यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दि. १५ मे रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी औषधप्राशन केले. या घटनेनंतर त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दि. २० मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याची खबर डॉ. स्नेहल चव्हाण, डॉ. दीपक जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, गौरी यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

कोरोनाच्या महामारीत अशाप्रकारे लोक आपले जीवन संपत असल्याचे दिसून येत आहे.