शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी रानगव्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:44 AM

कोरेगाव : जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडळी, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचे दर्शन होत ...

कोरेगाव : जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडळी, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचे दर्शन होत आहे. यामुळे शेतमजूर शेतीचे काम करण्यासाठी शेतात जाण्यास धजावत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कायम दुष्काळी हे बिरुद अंगावर घेऊन अनेक वर्षे पाणीटंचाईशी सामना करणार्‍या कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये जलसंधारणामुळे पाण्याचे मोठे साठे तयार झाले असून, हिरवळदेखील वाढली आहे. तालुका टँकरमुक्त झाला असून, वनक्षेत्रामध्ये वृक्षारोपण झाल्याने वनक्षेत्रातही वाढ झाली आहे.

एरव्ही पाचगणी-महाबळेश्‍वरच्या पट्ट्यात दिसणारे रानगवे आता कोरेगाव तालुक्यात दर्शन देऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. ल्हासुर्णेमध्ये शनिवारी रात्री रानगव्यांचा कळप फिरत होता, सोमवारी सकाळी जळगावमध्ये जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी हा कळप दिसला. रानगव्यांचा कळप फिरत असल्याची बातमी समजताच, अनेकांनी शेताकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी जर जात नसतील, तर आम्ही कसे जाणार, असा प्रश्न शेतमजूर विचारत आहेत.

(चौकट)

वन विभागाने वाढवली गस्त

अन्नाच्या शोधार्थ हे रानगवे तालुक्यात आल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली. शेतकर्‍यांच्या याविषयी तक्रारी आल्या असून, वन विभागाने गस्त वाढवल्याचे सांगण्यात आले.

फोटो : १२ कोरेगाव फोटो

जळगाव (ता. कोरेगाव) येथे जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी रानगव्यांचा कळप नजरेस पडत आहे.