शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

जिल्ह्यात कोरोनाचा चौथा स्तर... पाचव्याकडे कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हजाराकडे वाटचाल करत आहे. तर रुग्णवाढीचा दर बारा टक्क्यांच्या पुढे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हजाराकडे वाटचाल करत आहे. तर रुग्णवाढीचा दर बारा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सध्या चौथ्या स्तरात असलेला सातारा जिल्हा कुठल्याही क्षणी पाचव्या स्तरात जाईल तशी भीती आहे. जिल्ह्याच्या जनतेलाच आता प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्ण वाढ रोखणे आवश्यक बनले आहे.

राज्य शासनाने २५ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे जिल्ह्याचा स्तर ठरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे स्तर या चाचण्यानुसार ठरवले जातात. पाचव्या स्तरांमध्ये कडक निर्बंध घातले जातात. चौथ्या स्तरांमध्ये काही प्रमाणात त्यामध्ये सूट असते तर तिसऱ्या स्तरांमध्ये किराणा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व इतर दुकानांचे व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी असते.

सातारा जिल्हादेखील तिसऱ्या स्तरात होता, तेव्हा सकाळी नऊ ते चार यादरम्यान बाजारपेठेतील व्यवहार सुरू होते; परंतु आता जिल्हा चौथ्या सत्रात गेला असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शनिवार व रविवार पूर्णपणे संचारबंदी कायम आहे.

कोरोनाच्या रॅपिड ॲक्शन टेस्ट आणि आरटीपीसीआर या दोन चाचण्या केल्या जातात. आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल अचूक येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने या चाचण्यांवरच भर दिला आहे, तसेच या चाचण्यांमधून जी रुग्णवाढ होते, त्यानुसारच जिल्ह्याचे स्तर ठरविण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मागील आठवड्यापासून सातारा जिल्हा जरी सहा-सात टक्क्यांमध्ये होता, तरी आरटीपीसीआर चाचण्यांनुसार जिल्ह्यातील रुग्ण वाढले. हे प्रमाण १२ टक्क्यांच्या वर गेले. ही रुग्णवाढ कमी येत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात चौथ्या स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू केले आहेत.

रुग्णांची संख्या कमी असलेले तालुकेही वेठीस...

संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय रुग्ण वाढीचे स्तर ठरवले आहेत. वास्तविक, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, खटाव ही तालुके वगळता महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. तरीदेखील चौथ्या स्तरातील निर्बंध या तालुक्यामध्ये देखील लागू केलेले आहेत. जिल्ह्याचा निकष लावून स्तर ठरवले गेले असल्याने ज्या तालुक्‍यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणीदेखील दैनंदिन व्यवहार सुरू ठेवता येत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.