शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

वाहनांची चाके थांबल्याने गॅरेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सर्वसामान्य नागरिकांना संचारबंदीचा जसा फटका बसला, तसाच फटका गॅरेज चालक व वाहनधारकांनादेखील बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सर्वसामान्य नागरिकांना संचारबंदीचा जसा फटका बसला, तसाच फटका गॅरेज चालक व वाहनधारकांनादेखील बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून लाखो वाहने एकाच जागी उभी आहेत. त्यामुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर गॅरेज बंद असल्याने गॅरेज चालक व तेथील कारागिरांची उपासमार सुरू आहे.

सातारा जिल्हा राज्यात रेड झोनमध्ये गेलेला आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले जात आहेत. या संचारबंदीची झळ हातगाडीधारक, किरकोळ विक्रेते, फळ विक्रेते व हातावर पोट असणाऱ्यांना बसली. तसेच वाहनधारक व गॅरेज चालकांनादेखील याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

संचारबंदीमुळे जिल्ह्यातील सर्व गॅरेज सध्या बंद आहेत. शिवाय लाखो रुपयांची वाहने पार्किंग व रस्त्यावर उभी आहेत. जी वाहने रस्त्यावर धावत आहेत त्यांच्यात काही बिघाड झाला तर दुरुस्ती कुठे करायची, हा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या वाहनांमध्येदेखील इंजिन, बॅटरी व इतर तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. एकीकडे वाहनचालकांचे नुकसान तर दुसरीकडे गॅरेजचालकांनी उपासमार अशी परिस्थिती संचारबंदीत निर्माण झाली आहे.

(चौकट)

वाहने पार्किंगमध्ये

संचारबंदीचा फटका वाहनांनादेखील बसला आहे. कोणाच्या गाड्या पार्किंगमध्ये तर कोणाच्या रस्त्यावरच उभ्या आहेत. गाडी चालली नाही तर इंजिनला फटका बसू शकतो. हे नुकसान कोण भरून काढणार? आम्ही संचारबंदीचे काटेकोर पालन करीत आहोत. केवळ कामासाठीच घराबाहेर जात होतो. गेल्या दीड महिन्यात गाडीचा कमीतकमी वापर केला. आता तर गाडी पार्किंगमध्ये पडून आहे. गाडी बंद असल्याने बॅटरीचे नुकसान होत आहे, असे मत वाहनधारकांनी व्यक्त केले.

(चौकट)

वाहनधारकांसमोर अडचणींचा डोंगर

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. कारवाईच्या धास्तीने बहुतांश वाहनधारकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. अनेकांच्या घरात ५० हजारांपासून ५० लाखांपर्यंतच्या गाड्या आहेत. या सर्व गाड्या गेल्या एक - दीड महिन्यापासून जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांसमोर अडचणींचा डोंगर वाढू लागला आहे.

(चौकट)

गॅरेज बंद असल्याने अडचणी

जिल्ह्यात दहा लाखांच्या आसपास वाहने आहेत. संचारबंदीच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेशी निगडित वाहने रस्त्यावरून धावत आहेत. टायर पंक्चर होणे, इंजिन बंद पडणे, बॅटरीत बिघाड होणे अशा अनेक अडचणींना वाहनधारकांना तोंड द्यावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने एखादे वाहन जर बंद पडले तर करायचे काय, असा प्रश्न अनेकांपुढे उभा राहत आहे.

(कोट)

आमच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सततच्या संचारबंदीमुळे गॅरेज व्यवसाय पूर्णतः बंद झाला आहे. शासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. घरखर्च भागविणे सध्यातरी जिकिरीचे बनले आहे.

- अमित शिंदे, सातारा

(चौकट)

आमच्या गॅरेजमध्ये ग्रामीण भागातील दोन-तीन मुले काम करतात. संचारबंदीचा आम्हाला व कारागिरांना मोठा फटका बसला आहे. शासनाने गॅरेज सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.

- राहुल उतेकर, महाबळेश्वर

* आकडेवारीची चौकट देणार आहे.

* डमी ७४२ : २५ सचिन टेम्पलेट/ प्रूफ