शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
2
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
3
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
4
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
5
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
6
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
7
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
8
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...
9
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
10
Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड
11
लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा
12
"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस
13
३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
14
"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
15
मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास
16
Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब
17
४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."
18
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
19
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
20
Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

साहित्यातून बळीराजाच्या व्यथा मांडा !

By admin | Published: December 04, 2015 10:12 PM

कृषिजागर साहित्य संमेलन : शहरातील नागरिकांनी शेतकऱ्यांना समजून घ्यावे; रा. रं. बोराडे यांचे आवाहन

सातारा (प्रा. एम.एम.कलबुर्गी व्यासपीठ) : ‘भारताला कृषिप्रधान देश म्हटले गेले असले तरी आता शेती ही फायद्याची राहिलेली नाही. शेती आपल्याला जगवू शकते, हा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे. शेती करण्यात अर्थ नाही, ही शेतकऱ्याची मानसिकता झाली असून, ती भयावह आहे. व्यवसायभिमुख, शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांची मानसिकता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. साहित्याबरोबरच प्रत्येकात कृषिजागर निर्माण होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेच्या वतीने खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘कृषिजागर’साठी आयोजित केल्या दुसऱ्या सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, साहित्य परिषदेचे रवींद्र बेडकिहाळ, किशोर बेडकिहाळ, संमेलनाचे मुख्य निमंत्रक विनोद कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य बोराडे म्हणाले, ‘आज सर्वांपुढे शेतीबाबतचा आव्हानात्मक प्रश्न आणि त्याला वेगळ्या पद्धतीने भिडावे लागणार आहे. धरण कशासाठी बांधली गेली याचा विचार झाला पाहिजे. आज पाण्यासाठी छुपे युद्ध सुरू आहे. एकवेळ पाण्यासाठी प्रत्यक्षात मारामारी होण्याची वेळ येणार आहे. परंतु हे पाणी शेतकऱ्यांचे आहे. धरणे नसताना पावसाचे पाणी झिरपून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येत होते; परंतु पाणी अडवून झिरपणे बंद झाले. केवळ शेतीमध्ये काही नाही हे भीषण आणि दाहक सत्य स्वीकारले पाहिजे. शेतकऱ्याच्या नवीन पिढीला बाहेर काढले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या एका मुलाला नोकरीची हमी सरकारने घ्यायला हवी.’संमेलनाचे प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, शेतकऱ्यांची व्यथा साहित्यिकाच्या व्यासपीठावर येण्याची वेळ आली आहे. भविष्य नसलेला, सर्वंच बाबतीत परावलंबी असलेला व्यवसाय म्हणजे शेती. त्यांच्यात वेदना आहे, दु:ख आहे आणि त्यातूनच त्यांच्याकडून निर्मिती होते. अशा प्रकारच्या साहित्यासाठी शेतकरी साहित्य परिषदेची निर्मिती करू, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रमोद आलटकर, डॉ. उमेश करंबळेकर, डॉ. राजेंद्र माने, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे हरीष पाटणे, संमेलनाचे कार्याध्यक्ष संतोष यादव, राजू गाडसे, शिरीष चिटणीस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी, संमेलन समितीचे पदाधिकारी, सदस्य विविध जिल्ह्यातील साहित्यिक, रसिक आणि सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)श्रीपाल सबनीस यांचा सत्कारडॉ. श्रीपाल सबनीस, रवींद्र बेडकिहाळ, स्वागताध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या प्रारंभी हुतात्मा कर्नल संतोष महाडिकआणि वर्षभरात काळाच्या पडद्याआड गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सातारकरांच्या वतीने आणि साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीने रामराजे आणि मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. संमेलनाचे मुख्य निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.