शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

‘पालक’मंत्र्यासाठी म्हणे हातगाडेधारक ‘बेवारस’

By admin | Published: December 15, 2015 9:40 PM

विसावा नाका : लाल दिव्याची गाडी येणार म्हणून हटविले होते अतिक्रमण

सातारा : येथील जिल्हा परिषद ते विसावा नाका परिसरातील मागील काही वर्षांपासून हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण सांगून पालिकेने अतिक्रमण काढले. यावेळी सर्व गाडेधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते. परंतु, आज अखेर यांचे पुनर्वसन झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सातारा-कोरेगाव हा रस्ता चौपदीकरण करण्याची मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यात आली होती. यामध्ये फळ, वडापाव, चायनीज आदी हातगाडेधारकांचा समावेश आहे. त्यावेळी त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु पुनर्वसन न झाल्याने मिळेल त्या जागी हातगाड्या टाकून व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवला. त्यापैकी बहुतांशी व्यावसायिक जिल्हा परिषदेच्या चौकाला पसंती दिली. याठिकाणी शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडापाव, ज्यूस, फ्रुट विक्रेते, चायनिज अन्य हातगाड्यांचे अतिक्रमण होत गेले. अनेकांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी मागणीही केली होती. परंतु व्यावसायिकांच्या एकीने पर्याय जागा देणाऱ्याचा आग्रह धरला. पालकमंत्र्यांचा दौरा असून, चौकातील अतिक्रमण काही दिवसांसाठी काढा असे सांगून या चौकातील सर्व विक्रेते अतिक्रमण पालिकेने काढले आहे. सतत व्यवसायाची जागा बदलत असल्याने व्यावसायिकांना नुकसान होत आहे. पालिकेने पर्यायी जागा घ्यावा किंवा आम्हा सर्वांत पुनर्वसन करा. अशी मागणी आता येथील व्यावसायिकांतून होत आहे. अतिक्रमण काढल्याने अनेक मागण्या येथील फुटपाथवर अस्ताव्यस्त पडल्या असून, आज ना उद्या जागा मिळेल या अपेक्षेने व्यावसायिक हातगाड्यावरच बसून वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)व्यावसायिकांना पर्यायी जागा हवीय...सातारा-कोरेगाव रस्त्यावर पालिकेने आरक्षित केलेल्या काही जागा आहेत. सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढली आहेत. पालिकेने या जागा स्वच्छ करून रस्त्यावरील हातगाडीधारकांचे पुर्नवसन येथे केले तर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही आणि ग्राहकांनाही एकाच ठिकाणी सर्व मिळेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.रोजच्या दडपणाला आता कंटाळलोय!हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना कायमची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. ‘रोजच्या या दडपणाला आता आम्ही कंटाळलोय, काहीही करा आणि आम्हाला एकच सुरक्षित जागा द्या’ अशी आर्जव या व्यावसायिकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.