शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गोरगरिबांच्या शिवभोजनासाठी सरसावले दातृत्वाचे हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:29 AM

सातारा : जिल्ह्यातील जी जनता भोजनाच्या माध्यमातून एक वेळची भूक भागवत होती, त्या गोरगरीब जनतेला जेवण मोफत देण्याचा अनोखा ...

सातारा : जिल्ह्यातील जी जनता भोजनाच्या माध्यमातून एक वेळची भूक भागवत होती, त्या गोरगरीब जनतेला जेवण मोफत देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आणि बघता बघता दातृत्वाचे असंख्य हात पुढे येऊ लागले. येथील कल्याणी विद्यालयाच्या १९९९ मधील बॅचच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे मदत सुपूर्द केली.

गोरगरीब जनतेला एक वेळेचे मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, याचा लाभ जनता घेत आहे. आता सातारा शहरातील शिवभोजन थाळी व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळचे जेवणदेखील देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे मदतीचा ओघ येऊ लागला.

रात्रीच्या वेळच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी शिवभोजन चालकांकडून कोणत्याही अनुदानाची अथवा मोबदल्याची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्तीने जेवण वाटप करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुख्यतः सातारा शहरातील विविध प्रभागांतील झोपडपट्टीमधील गरीब व गरजू व्यक्ती पुलाखाली मुक्काम करणारे तसेच एसटी स्टँडवरून काम करणारे बेघर लोक, फिरस्ते कारागीर मजूर यांचा समावेश असेल.

जिल्हा प्रशासनाने शिवभोजन थाळी दोन्ही वेळेस मोफत लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा सन १९९९ च्या विद्यार्थ्यांनी ५०० किलो तांदूळ, ९० किलो मूगडाळ व ९० लिटर सोयाबीन तेल आपला खारीचा वाटा म्हणून आज ३१ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांच्या कार्यालयात माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांना उपलब्ध करून दिले आहे. याकामी शाळेचे माजी विद्यार्थी सागर कारंडे, तानाजी भणगे, सचिन खाडे, विजय कांबळे, अपर्णा लोखंडे, शैलजा शिरसवडे व अन्य मित्र-मैत्रिणींनी विशेष प्रयत्न केले.

यांना खरंच गरज आहे...

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे सध्या हात बंद आहेत. त्यांना अनेकदा एका वेळेच्या जेवणावरच भागवावे लागते. शासनाने शिवभोजन यानिमित्ताने त्यांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली, पण पोटाची भूक ही किमान दोन वेळा तरी माणसाला भागवावी लागते. रात्रीच्या जेवणाची सोय जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेतला. या लोकांना खरंच अन्नाची गरज आहे.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांच्याकडे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत सुपूर्द केली.