शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

By नितीन काळेल | Published: August 26, 2024 7:03 PM

गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून, सोमवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा ९६ टीएमसीजवळ पोहोचला. तसेच धरण ९१ टक्के भरले. परिणामी, धरणाने गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली आहे. तर धरणात २४ तासांत सुमारे साडेतीन टीएमसी साठा वाढला आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाली. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे खरीप हंगामातील पेरणी वेळेवर सुरू होऊन समाप्त झाली. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यानंतर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात अतिवृष्टी होती. सलग १२ दिवस पावसाने डोळा उघडला नव्हता. त्यामुळे तळ गाठलेल्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यातच या प्रमुख प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. सध्या ही प्रमुख धरणे ९० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला असल्याने धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत.

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतशिवारात, भात खाचरात पाणी साचून राहिले आहे. तर २४ तासांत नवजा येथे १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे तब्बल ५ हजार ४९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच कोयनेला ४ हजार ६३४ आणि महाबळेश्वर येथे ५ हजार २६५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना धरणात २४ तासांत ३.४१ टीएमसी पाणीसाठा वाढला. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९५.७९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९१.०१ टक्केवारी साठ्याची आहे. आता धरण भरण्यासाठी ९ टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.

पाऊस वाढला; धरणांतून पुन्हा विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणांतून पुन्हा पाणी सोडणे सुरू झाले आहे. परिणामी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या वीज गृहातून ४००, तर दरवाजातून दोन हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे वेण्णा नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू करण्याबाबत नियोजन झाले आहे. वाई तालुक्यातील बलकवडी धरणातही पावसामुळे आवक वाढली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी धोम धरणात जात असल्यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील बलकवडी, परतवडी, दह्याट, बोरगावसह अन्य गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसी साठा..जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस होता. यामुळे अनेक प्रमुख धरणे भरली नव्हती. यामध्ये कोयना धरणाचाही समावेश आहे. कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसीवर साठा झाला होता. हा टप्पा आता पार झालेला आहे. पावसाचा जाेर पाहता, ऑगस्टअखेर धरण भरू शकते, असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण