शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

विजेच्या लंपडावाने शेतकरी मेटाकुटीला, भारनियमनाचा परिणाम; शेतीची कामे खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 1:08 PM

चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.

कोपर्डे हवेली : सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने ऊष्णतेच वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे पिकांना जादा पाणी लागत आहे. त्यातच वीजेचे भारनियमन वाढले आहे. वीज येणा-जाण्यात सातत्य नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीकडे वीजेचे वेळापत्रक नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दिवस आणि रात्री विभागानुसार वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाला आठ तास वीज दिली जाते. चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.काहीवेळा विभानुसार व्हाट्सअप मेजेस विज वितरण कंपनीकडून पाठवले जातात. त्यामध्ये वीज येणार नाही असे सांगितले जाते. पण येणार कधी हे सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांना वाट पाहत बसावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना जादा पाणी लागत आहे. पाणी असूनही देता येत नाही अशी अवस्था विजेआभावी होत आहे.शेतकरी विजेची वाट पाहत बसत असल्याने दुसऱ्या कामांचा खोळांबा होत आहे. बीले भरुन आम्हाला वेळेत वीज मिळत नाही, आशी शेतकऱ्यांची भावना आहे. भारनियमनात विजेचे वेळापत्रक ठरवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीजFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण