शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

By admin | Published: March 11, 2017 4:48 PM

दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी

लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धावलोणंद : स्थानिक शेतकऱ्यांकडून संपादित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या रकमेपैकी ६५ टक्के रक्कम परत घेऊन त्यांचे सातारा जिल्ह्यातील शेडगेवाडी, ता. खंडाळा येथे पुनर्वसन केले. मात्र, या ठिकाणी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रकल्पग्रस्तांना शेतीशिवाय आपले घर चालवण्याची वेळ आली. नीरा-देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी शेडगेवाडीपर्यंत पोहोचण्याची सोय असतानाही राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिली नाही. सरकारकडे वारंवार निवेदन करून आश्वासनाशिवाय काहीही ठोस पावले उचलण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.उदरनिर्वाह करण्याच्या अधिकारावर राज्य सरकारने गदा आणली आहे. त्यामुळे संबंधितांना दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये नीरा-देवघर प्रकल्पग्रस्त खंडाळा तालुक्यात दापकेघर, देवघर आणि साळव आणि फलटण तालुक्यात माझेरी, परहर बुद्रुक, खुर्द, शिरवली, वाखंड अशी एकूण सहा गावे असून, या निकालाचा फायदा या गावानांसुद्धा होणार आहे. (वार्ताहर)