शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

ऐतिहासिक मंगळवार तळ्याला झुडपांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:27 AM

सातारा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या सातारा शहराला इतिहासात महत्त्वाचे स्थान लाभले आहे. या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आपले ...

सातारा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या सातारा शहराला इतिहासात महत्त्वाचे स्थान लाभले आहे. या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून असलेले हौद व तळ्यांचे अस्तित्व मात्र धोक्यात येऊ लागले. आहे. शहरातील मंगळवार तळ्याला झाडाझुडपांनी वेढा दिला असून, येथील स्वच्छतेकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.

सातारा शहराची भौगोलिक रचना पाहता शहराच्या जवळपास नदी अथवा मोठा तलाव नाही. त्यामुळे हे शहर वसविणाऱ्या राज्यकर्त्यांनी शहरात सर्वप्रथम पाणी खेळवले. शहरात प्रथम पाणी आले ते यवतेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तळ्यातून. शहरात पाणी आल्यानंतर प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी पाणी वितरण व्यवस्था समृद्ध केली. शहरात तळी व हौद बांधले. कालांतराने नवीन राजवाड्याचे बांधकाम करण्यासाठी मंगळवार पेठेत खोदकाम करून दगड काढण्यात आले. या खड्ड्याच्या ठिकाणी औंधच्या पंतप्रतिनिधींकडून आखीव-रेखीव तळे बांधण्यात आले. पुढे पेठेच्या नावावरून या तळ्याला मंगळवार तळे हे नाव रूढ झाले. पूर्वी हे तळे ‘पंतांचे तळे’ अथवा ‘श्रीपतरावांचे तळे’ म्हणूनही ओळखले जायचे. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तळ्याचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे.

तळ्याच्या चारही बाजूंच्या भिंतींवर झाडाझुडपांचे साम्राज्य वाढले असून, या झुडपांची मुळे संरक्षक भिंती कमकुवत करू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच एका वाहनाच्या धडकेत तळ्याचा भिंतीचा काही भाग देखील ढासळला आहे. बंदी असताना देखील या तळ्यात अनेक नागरिक निर्माल्य टाकतात. त्यामुळे तलावातील पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून, याचा फटका तळ्यातील जलचरांवर होत आहे. पाण्यातील आॅक्सिजनची पातळी कमी झाल्याने काही महिन्यांपूर्वी तळ्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले. नानाविध कारणांनी या तळ्याचे अस्तित्व धोक्यात आले असताना पालिका प्रशासनाकडून त्याच्या संवर्धनासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे इतिहास प्रेमींमधूनही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

(चौकट)

तळे करण्यात आले होते गाळमुक्त

सातारा पालिकेकडून काही वर्षांपूर्वी मंगळवार तळे गाळमुक्त करण्यात आले होते. याशिवाय या तळ्यात गणेशमूर्ती विसर्जनासाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी पालिका प्रशासनाकडून ऐतिहासिक वस्तूंची म्हणावी तशी निगा राखली जात नाही. मंगळवार तळ्याबरोबरच शहरातील इतर तळी व हौदांची अवस्था देखील काहीशी अशीच झाली आहे.

(कोट)

तळ्याची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु पालिका प्रशासनाकडून तसे होताना दिसत नाही. नागरिक येता-जाता तळ्यात निर्माल्य टाकतात. काही जण घरातील कचरादेखील टाकतात. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. तळ्याची स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.

- श्रीरंग काटेकर, सातारा

फोटो : ०९ मंगळवार तळे

सातारा शहरातील ऐतिहासिक मंगळवार तळ्याला अशा प्रकारे झाडाझुडपांनी वेढा दिला आहे.