शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

धरणाचे पात्र कोरडे; शेतकरी हवालदिल

By admin | Published: December 04, 2015 10:01 PM

खंडाळा : वीरची गतवर्षीपेक्षा निम्म्याने पातळी खालावली

दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून वीर धरणाच्या उजव्या कालव्याकडे पाहिले जाते. यावर्षी खंडाळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे वीर धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून शेतीपिकांचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आराखडा कोलमडला असून ‘धरणाचे पाणी खोल, शेतकरी झाले हवालदिल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, धरणात गेल्यावर्षी नोव्हेंबरअखेर ६ टीएमसी पाणी होते. सध्या ३. ५ टीएमसी पाणीसाठा आहे.खंडाळा तालुक्याच्या सीमेवर नीरा नदीवर असणाऱ्या वीर धरणात तालुक्यातील काही भागांची शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. वीर धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.७५ टीएमसी एवढी आहे. यावर्षी पाऊसकाळ कमी झाल्याने धरणात नोव्हेंबर अखेरच पाणीसाठा खालावला आहे. गतवर्षी नोव्हेंबर अखेर ६ टीएमसी पाणी शिल्लक होते. मात्र, यावर्षी तो तब्बल निम्म्याने कमी होऊन आजअखेर केवळ ३.५ टीएमसीच पाणी राहिले आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये जी स्थिती असते ती चार महिने अगोदरच निर्माण झाली असल्याने पाण्याची बिकट परिस्थिती उद्भवली आहे.खंडाळा तालुक्यातील भादे, अंदोरी, वाठार बु।।, मोवे, दापकेघर, शेडगेवाडी, कराडवाडी, पिंपरे बु।। बावकलवाडी, रुई यांसह अनेक गावांची शेती वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून आहे. याशिवाय काही गावांच्या पिण्याच्या पाणीयोजनाही येथूनच सुरू आहेत. धरणातून कालव्याला पाणी सोडले तरच गावच्या पाणीयोजना सुरळीतपणे सुरू असतात. अन्यथा गावातून पाणीपुरवठा खंडित होतो.वीर धरणावर अवलंबून असलेल्या शेतीत मुख्यत: ऊस, कांदा ही नगदी पिके तर ज्वारी, बाजरी, भुईमूग, हरभरा, कडधान्ये गहू, कापूस, फळबागा अशी शेतीपिके अवलंबून आहेत. सद्य:स्थितीत कांदा आणि ऊस, फळबागा ही पिके व ज्वारीचा हंगाम पार पाडण्यासाठी धरणाच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र धरणातीलच पाणी कमी असल्याने कालव्याला सातत्याने पाणी सोडणे अशक्य बनणार आहे. शेतीपिके धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने लाखोंच्या उत्पादनावर पाणी सोडावे लागेल. या भीतीने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याच तालुक्यातील भाटघर धरणातील पाणी गरजेनुसार सोडल्यास वीर धरणाच्या पाणीसाठ्यात भर पडणार आहे. परंतु भाटघर धरणातही सध्या केवळ १५ टीएमसीच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी हिवाळ्याच्या प्रारंभालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय, अशी परिस्थिती आहे. सध्या ऊसतोड सुरू असली तरी नवीन लागणीचा ऊस आणि कांदा पीक टिकविणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. वीर धरणात जर पाणी आले नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. आमच्या गावची पाणीपुरवठा योजना वीर धरण कालव्यावर अवलंबून आहे. कालव्याला पाणी सुटले तर विहिरीला पाणी येते त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो. कालव्यास पाणी नसेल तर पाणी योजनेवर परिणाम होतो. आत्ताच दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी लागेल.- मीता धायगुडे, सरपंच, वाघोशीसध्या धरणात ३.५ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ६ टीएमसी होता. भाटघर धरणातील पाणी मागणीनुसार उपलब्ध झाल्यास पाणी नियोजन करता येईल.- एस. एस. शेडगे, वायरलेस आॅपरेटर, वीर धरण व्यवस्थापनया भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याच्या योजना विहिरीवरून असल्या तरी विहिरी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याचे पाणी पाझरून विहिरींचा पाणीसाठा वाढतो, त्यावर शेतीपाण्याचे नियोजन करावे लागते. - धनाजी जाधव, शेतकरी