शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

लॉकडाऊनमुळे पावसाळ्यातील धान्यसाठा कसा भरायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:28 AM

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी ...

बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणाऱ्या लोकांना तसेच नदीपलीकडील अनेक गावच्या लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. अशावेळी येथील लोक मे महिन्यातच चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा करून ठेवतात. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने हे काम थांबले आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने अतिपावसाचे असतात. मान्सून पाऊस सुरू झाला की दळणवळण व संपर्क यंत्रणा ठप्प होतात. जावली तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत. गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावांतील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. याठिकाणचे लोक साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रकमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. परंतु यावर्षी कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठच बंद आहे. त्यामुळे अन्नधान्य साठा कसा करायचा, हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पावसाळ्यात सलग चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो. पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे नागरिक प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही.उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. परिसरातील लोकांना पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या डोंगरातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांचाही आस्वाद ग्रामस्थ मनसोक्त घेतात.

चौकट

पोटमाळ्यावर जनावरांची वैरण अन् सरपण

तापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात. स्वयंपाकासाठी याचा उपयोग होतो, अशी माहिती लामज येथील शिवराम चव्हाण यांनी दिली.

कोट

तळदेव मायणी गाव ठोसेघर पठारापलीकडे दुर्गम ठिकाणी वसले आहे. पावसाळ्याचा धान्यसाठा ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून नेऊन आपल्या घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी अशीच कसरत करावी लागते. पावसाळ्यात कोण आजारी पडले तर गावकऱ्यांना डोली बनवून डोक्यावरून ठोसेघर पठारापर्यंत धुकके-वादळ- पावसातून न्यावे लागते.

- पांडुरंग पवार, ग्रामस्थ, तळदेव मायणी.