शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाच्या फेऱ्यात शेकडो एकर स्ट्रॉबेरी, नुकसान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:46 IST

पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत असल्याने लाल करप्या रोग व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या फेऱ्यात शेकडो एकर स्ट्रॉबेरी, नुकसान वाढले करप्याचा रोगाचा प्रदुर्भाव; लष्करी अळीचीही कीड

पाचगणी : पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत असल्याने लाल करप्या रोग व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाबळेश्वर तालुक्यातील लोकांचे आर्थिक जीवनमान उंचविणारे स्ट्रॉबेरी पीक यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अडचणीच्या गर्तेत अडकले आहे. या पावसाच्या पाण्याच्या थेंबामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडांच्या पानांवर व येणाऱ्या फुलांच्या बहरारास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्न वाढीस जोराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी धास्तावलाय. स्ट्रॉबेरीच्या खर्चाची गुंतवणूक व उत्पन्नाचा मेळच बसणे यावर्षी अवघड झालेलं दिसत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे.जून महिन्यात सुरु झालेल्या पावसाने आतापर्यंत उसंतच न घेतल्याने स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड सुद्धा वेळेत करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे मुळातच स्ट्रॉबेरी हंगामावर त्याचा परिणाम झालाय. परिणामी स्ट्रॉबेरी उशिरानेच मार्केटमध्ये उपलब्ध होणार होती. परंतु आता झाडांना फळ लागण्याची सुरुवात आणि पुन्हा परतीच्या पावसाचा कहर सुरु झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावरील स्ट्रोबेरीच्या शेतीचे नुकसान होणार आहे.स्ट्रॉबेरीचे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ जुळवूने कठीण होणार तर आहेच. त्याच बरोबर उत्पादन घटणार असल्याने स्ट्रॉबेरीची चव घेणं अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच स्ट्रॉबेरीच दर गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या वर्षी पावसाने सर्वच शेतीचे नुकसान केले असून या अगोदरच महाबळेश्वर तालुक्यतील वाटाणा, बटाटा, फरसबी हातातून गेलं आहे. आता स्ट्रॉबेरीच्या पिकाकडे डोळा लावून शेतकरी बसला होता. परंतु पावसाने व धुक्याने ते पीक सुद्धा हातून निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला जाणार आहे.

शासनाने याकडे गांभिर्याने पाहून ओला दुष्काळ जाहीर करीत या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईसाठी एकवटण्याच्या तयारीत आहे.चव पडणार महाग...ऐकूण उत्पन्नाच्या ८० टक्के स्ट्रॉबेरी म्हाबळेश्वर तालुक्यात घेतली जाते. यावर्षी या पावसाच्या अस्मानी संकटामुळे त्यामध्ये मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वरमधील या लालबुंद रुचकर फळाची चव घेणं महाग होणार आहे.

सततच्या पावसाने आम्हा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरटेच मोडलं असून उत्पादन खर्चाचा मेळ बसविणेसुद्धा अवघड झालं आहे. शेतीचा सर्वच खर्च निघणे दुरापस्त झालं आहे. आता आर्थिक गणितच कोलमडून जाणार आहे.- महेंद्र पांगारे, पांगरीस्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी 

 

 

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थानSatara areaसातारा परिसर