शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

साठा झाला की पाणी जातेय वाया

By admin | Published: December 18, 2014 9:22 PM

गोंदवले खुर्द : बंधाऱ्याचा पाया खचला; तत्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

गोंदवले : गोंदवले खुर्द, ता. माण येथील माणगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पाया खचत असून, पाणीसाठा झाल्यास खचलेल्या जागेतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. बंधारा कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर असून, पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गोंदवले खुर्दमध्ये माण नदीवर आठ वर्षांपूर्वी राज्य शासन अंगीकृत जिहे-कठापूर उपसा जलसिंचन कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सुमारे पस्तीस लाख खर्च करून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम मिहीर इंटरप्रायजेस सोलापूर यांनी पूर्ण केले आहे. बंधारा बांधण्याच्या ठिकाणी नदीपात्रात बहुतांश भाग खडकाळ असल्याने पाया काढताना या ठिकाणी जिलेटीन स्फोट करून ब्रोकरच्या साह्याने पाया खणावा लागला. या जिलेटीन स्फोटाने पाया खालचा खडकाळ भाग पूर्ण हादरला होता. यानंतर बंधारा बांधण्याचे काम संपल्यानंतर नदीला पूर आल्यावर इथे चांगला पाणीसाठा झाला. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. मात्र, काही दिवसांतच नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधारा रिकामा होऊ लागला. बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाणी, विहिरींची पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी समाधानी झाले. मात्र, हे समाधान फार दिवस टिकले नाही. नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधाऱ्याच्या पायातून अनेक दगड निसटून पाणी आणखी वाहू लागल्याने बंधारा रिकामा होऊ लागला. नदीपात्रात दक्षिण-उत्तर बंधारा असून, उत्तर बाजूच्या टेकडीमध्ये सुमारे दहा फूट आतपासून सिमेंट बांधकाम आहे. त्या बांधकामाच्या खालून तीन फूट खोल आणि वीस फूट लांब पाया खचला आहे. हा बंधारा लवकरच कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)लोखंडी दारांअभावी पाणी वाया बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी लोखंडी दारे आहेत. मात्र, ही दारे देखील इतरत्र पडलेली असतात. पावसाळ्याच्या दिवसांतसुद्धा अनेकवेळा दारे सापडत नाहीत. त्यामुळे ते पाणी अडविताना अडचण होते. पाटबंधारे विभागाने कितीही पाणी आडवायचा प्रयत्न केला तरी लोखंडी दारांअभावी पाणी वाहून जाते.माण नदीवरील सर्वच बंधाऱ्यांची कामे झाली असून, पाणीसाठा होण्यासाठी पाणी गळती थांबविणे महत्त्वाचे आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अर्जुन शेडगे, सरपंच