शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

'अतिरिक्त भूसंपादन शेतकऱ्यांवर अन्यायकारक', फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 6:03 PM

मिरगाव, नांदल व ढवळेवाडी या गावातील जमिनी कवडीमोल भावात घेऊन मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांसाठी दिल्या जाणार

मलटण : फलटण तालुक्यात सुरवडी एमआयडीसीसाठी आधीच अत्यल्प दरात शेतजमिनी भूसंपादित केल्या आहेत. यानंतर अतिरिक्त भूसंपादन करण्याची प्रक्रिया मिरगाव, नांदल व ढवळेवाडी या गावांमध्ये शासनातर्फे सुरू आहे. हे अतिरिक्त भूसंपादन शेती व शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे असून, हजारो अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत, शेतीपूरक व्यवसायही बंद करून मोलमजुरी करावी लागेल, यामुळे या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनास आमचा तीव्र विरोध आहे, असे फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी सांगितले.या अतिरिक्त भूसंपादनास विरोध करण्यासाठी तिन्ही गावांतील शेतकरी व महिलांनी फलटण येथील नाना पाटील चौक ते उपविभागीय कार्यालय असा मोर्चा काढला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या गावांतील शेतकऱ्यांकडे या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी इतर कोणतेही साधन उपलब्ध नाही. दुग्धव्यवसाय व कुक्कुट व्यवसायही याच जमिनींना पूरक व्यवसाय म्हणून चालतात, असे असताना अतिरिक्त एमआयडीसीसाठी ही जमीन संपादित झाल्यास शेकडो कुटुंब भूमिहीन होणार आहेत. या पूर्वीही नीरा-देवधर प्रकल्पाच्या पुनर्विकास कामी येथील जमिनी संपादित केल्या गेल्या तसेच सुरवडी येथील एमआयडीसीसाठी अनेक शेतकऱ्यांनी जमिनी देऊन त्यांना अत्यल्प किंमत मिळाली आणि नोकरीचा लाभ आजही या शेतकऱ्यांना मिळाला नाही.दोनदा भूसंपादन होऊन आता ज्या जमिनी शिल्लक आहेत, त्या बहुतांश विहीर बागायत तसेच नीरा-देवधर लाभ क्षेत्रांत येणाऱ्या आहेत. मग या जमिनीचे भूसंपादन कशासाठी केले जात आहे. तिन्ही गावांपैकी कोणत्याही ग्रामपंचायतीने अशी मागणी केलेली नाही अथवा ठराव मंजूर केलेला नाही, या उलट हे भूसंपादन होऊ नये असाच ठराव मंजूर केलेला असताना भूसंपादन करण्याचा अट्टाहास शासन का करत आहे, या भूसंपादनास तीव्र विरोध असून, वेळ पडल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी मोर्चास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये ‘ रासप’चे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, अशोकराव जाधव, बजरंग गावडे, शिवसेना फलटणचे प्रदीप झणझणे, विराज खराडे, अमोल सस्ते, नितीन जगताप, तुकाराम गायकवाड, सुशांत निंबाळकर, युवराज शिंदे, राजाभाऊ नागटिळे, अशोक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.कवडीमोल भावात जमिनी....मिरगाव, नांदल व ढवळेवाडी या गावातील जमिनी कवडीमोल भावात घेऊन मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांसाठी दिल्या जाणार आहेत, आधी झालेल्या भूसंपादनातही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात घेऊन नोकरीचे आमिष दाखवले, मात्र असा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी