शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

ढगांच्या गडगडाटात सातारा शहर, फलटणला वळवाने झोडपले

By नितीन काळेल | Published: April 19, 2023 6:23 PM

एका विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस : आठवड्यात सहावेळा  हजेरी; पाऊण तास बॅटिंग 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहर आणि परिसराला बुधवारी सायंकाळी ५  वाजण्याच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. तर मंगळवारी फक्त साताऱ्यात पाऊस झाला नाही. मात्र मागील आठवड्यात सहावेळा वळीवाने हजेरी लावली आहे. पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.    

फलटण शहर परिसरामध्ये देखील सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडडाटासह पाऊस सुरु झाला. यामुळे परिसरातील वीज गेली होती.

     सातारा जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. त्यामुळे पावसाळा पोषक वातावरण तयार होत होते. याची सुरुवात मागील गुरुवारपासून झाली. त्यावेळी गुरुवारी जिल्ह्यातील मान,  खटाव, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर पाटण तालुक्यातच एका ठिकाणी वीज पडण्याची घटना घडली होती. सातारा शहरातही पाऊस झाला होता. आठ दिवसाचा विचार करता सातारा शहरात सहा दिवस पाऊस पडलेला आहे. तर जिल्ह्यात दररोज कोणत्या कोणत्या भागात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. यामध्ये अधिक करून गाराच अधिक पडतात. परिमेय शेती पिकांचे आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ८ एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे सात कोटी रुपयांचे पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच पाऊस आणखी पाठ सोडण्यास तयार नाही. बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तसेच सातारा शहरातही जोरदार हजेरी लावली. 

   सातारा शहर आणि परिसरात बुधवारी  सकाळपासूनच उकाडा तीव्र होता. बारानंतर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस लवकरच पडणार असा अंदाज होता. दुपारी चारच्या सुमारास सातारा शहर आणि परिसरात आभाळ भरून आले. त्याचबरोबर ढगाचा गडगडाट सुरू झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले.  त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली.  छोट्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. 

आंब्याचे नुकसान... सातारा शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी आंब्याची झाड लावली आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूलाही झाडे आहेत. वारे आणि पावसामुळे आंबे गळून खाली पडत आहेत. बुधवारीही पावसामुळे आंबे खाली पडले.  परिणामी आंब्याचे नुकसान झाले. 

टॅग्स :Rainपाऊस