शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दरडप्रवणमधील ग्रामसेवक मुख्यालयी; गटविकास अधिकारी आपत्ती गावी

By नितीन काळेल | Updated: July 25, 2023 19:11 IST

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद अॅक्शन मोडवर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाने दाणादाण सुरू असल्याने दरडप्रवण गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद प्रशासनही सतर्क झाले असून अतिवृष्टी तसेच दरडप्रवणीमधील ग्रामसेवकांना मुख्यालय सोडू नये, तर गटविकास अधिकाऱ्यांना धोकादायक गावांना भेटी देण्याची सूचना केली आहे. यामुळे जिल्हा परिषदही अॅक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून धुवाॅंधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अतिवृष्टीने काही भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापर्यंत जवळपास ५०० कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केले आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच आता जिल्हा परिषद प्रशासनही अॅक्शन मोडवर आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारितीतील सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष हे २४ तास कार्यरत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी राहवे लागणार आहे. तर अतिवृष्टी आणि दरडप्रवण क्षेत्रातील सर्व ग्रामसेवकांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये, अशी स्पष्ट सूचनाच करण्यात आली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलनzpजिल्हा परिषद