शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देशी वृक्षलागवड करावी : मांडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:24 AM

खटाव : ‘वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे निसर्गाचा अर्थातच पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रचंड प्रमाणात ...

खटाव : ‘वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे निसर्गाचा अर्थातच पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रचंड प्रमाणात देशी वृक्षलागवड करायला हवी. यासाठी समाज जागृती अभियान फार महत्त्वाचे आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून प्रयास सामाजिक संस्थेमार्फत ठिकठिकाणी ‘नक्षत्र वन’ या उपक्रमातून देशी वृक्षांची लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे,’ अशी माहिती प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे यांनी दिली.

खटाव, ता. खटाव येथील पोवई गणेश टेकडी येथे नक्षत्र वन वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमाप्रसंगी खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख, प्रयास सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला, प्रयास संस्थेचे सर्व सदस्य, पोवई गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमर देशमुख, उपाध्यक्ष राजाराम शिंदे, हणमंत रजपूत, किरण राऊत, नानासाहेब जाधव, विलास देशमुख, महेश चव्हाण, रामभाऊ भूप, राजेंद्र डोंबे, दीपक भोसले, सौरभ पवार, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कोरोना पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाप्रसंगी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. या नक्षत्र वन लागवडीत वड, पायरी, बेल, नागकेशर, काटेसावर, मोह, फणस, शमी, आंबा, कुचला, उंबर, पिंपळ, खैर, वेत, जांभूळ, आवळा, कडुनिंब, कदंब, अर्जुन, जाई, पळस अशा दुर्मिळ देशी वृक्षांचा समावेश आहे. प्रयास सामाजिक संस्थेतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनच नव्हे तर जल संधारण, मृदा संधारणा, स्वच्छता अभियान तसेच झाडांचा वाढदिवस व झाडांना रक्षाबंधन असे नवनवीन व समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. त्यामुळे या संस्थेचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत असते.