शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
2
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
3
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
4
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
5
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
6
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
7
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
8
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...
9
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
10
Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड
11
लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा
12
"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस
13
३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
14
"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
15
मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास
16
Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब
17
४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."
18
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
19
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
20
Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी घेणार पुढाकार : विजय शिवतारे

By admin | Published: October 02, 2016 12:53 AM

बैठकीत माहिती : शांततेने महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

सातारा : ‘ज्याप्रमाणे बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत बंधने घालण्यात आली आहेत. त्याप्रमाणे चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्याचे बंधन घालणे गरजेचे आहे. मुलांना शैक्षणिक कर्ज मिळाले तर त्यांचे करिअर घडेल. कर्ज दिलेल्यामधील ६० टक्के मुलांनी जरी कर्ज फेडले तरी भरपूर आहे. इतर कर्ज सरकार भरेल. नाहीतर अडचणीत आलेल्या कारखान्यांचे पैसे सरकार भरत असते, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चातून गेल्या ५० वर्षांची खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे मराठा समाजाला या आंदोलनातून आरक्षण मिळाले पाहिजे. साताऱ्यात होणाऱ्या महामोर्चात मराठा बांधवांनी हिंसाचाराला बाजूला ठेवून शांततेत महामोर्चा पार पाडावा,’ असे आवाहन त्यांनी केले. येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहात मराठा क्रांती महामोर्चाबाबत मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच संयोजन समितीने मराठा आरक्षणाबाबतच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. शिवतारे म्हणाले, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, अशी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बाजू मांडल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सातारा शहरात निघणाऱ्या महामोर्चाला लागणारे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले. मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या सदस्यांनी ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी मराठा समाजातील ९० ते ९५ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विना डोनेशन शिक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. शिवतारे यांनी आरक्षणामुळे कमी टक्केवारी त्यांना क्लार्क म्हणून काम करावे लागत आहे. त्यानंतर प्रमोशनचीही तशीच विदारक अवस्था आहे. सगळी पडीक कामे आज मराठा समाजातील लोकांना करावी लागत आहेत. (प्रतिनिधी) ५० वर्षांची खदखद बाहेर महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाची गेल्या ५० वर्षांची खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे मराठा समाजाला या आंदोलनातून आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी सरकारकडे माझी शिष्टाई सुरू आहे. सातारा येथे होणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. हुल्लडबाजांना रोखावे वातावरण निर्मितीसाठी रॅली योग्य आहे; पण काही अतिउत्साही कार्यकर्ते हुल्लडबाजी करू लागले आहेत. चारचाकी व दुचाकीवर झेंडे लावून गाडी आडवी मारणे अशा पद्धतीने अरेरावी करणे चालू आहे. शुक्रवारपासून तक्रारी येत आहेत. आज मी समक्ष दोन ठिकाणी पाहिले त्यांना समजावून सांगितले. आपला अन्यायाविरुद्धचा निषेध मूक महामोर्चा आहे. तेव्हा नीट वागा संयम सोडू नका. प्रसारमाध्यमांनी यासाठी आवाज उठवावा, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी केली.