शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

‘एफआरपी’चा कायदा मोडून शासनाकडून अन्याय

By admin | Published: December 17, 2015 10:47 PM

सुभाष पाटील : कडेगावात शेकापचे आंदोलन

कडेगाव : साखर कारखानदार आणि राज्य शासन एफआरपीचा कायदा मोडून ऊस उत्पादकांवर अन्याय करीत आहेत. याविरुद्ध गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कडेगावात तहसील कार्यालयासमोर अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखानदार व सरकारचा निषेध करण्यात आला.ऊस उत्पादकांना उसाची किंमत एफआरपीप्रमाणे एकरकमी व ताबडतोब मिळाली पाहिजे. गळीत हंगाम सुरू होऊन ४० ते ४५ दिवस झाले, तरी अद्याप जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एक रुपयाही दिलेला नाही. ऊस तुटल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाची रक्कम मिळाली पाहिजे, असे कायदा सांगतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यात सरकारची आहे. परंतु राज्य सरकार कायदा मोडला म्हणून कारखानदारांवर काहीच कारवाई करीत नाही. याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे अ‍ॅड. पाटील म्हणाले. यावेळी कडेगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश लोखंडे, सुभाष पवार, परशराम माळी, इंद्रजित पाटील, नारायण वाघमोडे, विलास कदम, मारुती पवार, श्रीरंग यादव, पांडुरंग कुंभार, सुनील जगताप, सचिन मोरे, राजेंद्र माने, डॉ. अभिमन्यू जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटना, स्वभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. (वार्ताहर)कडेगाव येथे आंदोलन सुरू असताना, आंदोलनकर्त्यांना सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम भेटले. ‘मीही तुमच्याबरोबर आहे, मीही शेतकरी आहे’, असे कदम यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. पाटील यांनी, ‘मोहनरावदादा आमच्याबरोबर आहात, तर तुम्हीच कोंडी फोडा’, असे सांगितले. यावर कदम यांनी, दोन दिवसात पुणे येथे बैठक आहे. या बैठकीत निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.