शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

कामात मन रमविणे हीच शेतकऱ्यांची करमणूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:39 AM

कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल ...

कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल विकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतातील कामे करतानाही मजूर मिळत नसल्याने ताणतणावात राहावे लागतेय. अशा काळात तणाव दूर करण्यासाठी शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. कधी शेतीविषयक माहिती मिळवत आहेत. तर काहीवेळा त्यातून गाणी ऐकण्याचा आनंदही घेत आहेत. काहीजण घरात टीसव्ही बघत आहेत. या मनोरंजनापेक्षा शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम तयारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे कामात मन रमविणे हेच करमणुकीचे साधन झाले आहे.

मागील एक वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कधी त्याची तीव्रता कमी होते तर काहीवेळा वाढते. पण, या कोरोना संकटाचा परिणाम कृषी क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामध्ये शेतकरी पिचलाय. पिकलेल्या मालाला भाव मिळत नाही. विकायचा झाला तर आठवडी बाजार बंद. बाजार समितीत घेऊन जायचं झालं तर उठाव आणि दर नाही. यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यासाठी बियाणे आणि खतांची जुळणी करायची आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकायची आहेत. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतीची खूप कामे करायची आहेत. वेळ आहे पण कोरोनामुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. त्यामधून शेतीविषयक चांगली माहिती मिळवणे, गाणी ऐकणे अशाप्रकारे ते आपली करमणूक करून घेत आहेत. काही शेतकरी तर मोबाईलवरून विविध बाजार समितीमधील दाराची माहिती घेत आहेत. काही शेतकरी शेतशिवारात जाऊन शक्य तसे शेतीची कामे करत आहेत. कारण, खरीप हंगाम तयारी आतापासूनच केली तरच पाऊस झाल्या-झाल्या पेरणीला सुरुवात करता येणार आहे. एकप्रकारे कोरोना तणावातही शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी मनोरंजनच ठरणारे आहे.

चौकट :

बळीराजासाठी शेतीच श्वास अन् घास...

बळीराजा वर्षभर शेतीतच रमत असतो. कितीही संकटे आली तरी त्याला त्यापासून दूर पळता येत नाही. एका पिकाने दगा दिला तर दुसरे पदरात टाकेल, असा विश्वास असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेती हा श्वास असतो तर पिकल्यावर घास मिळवून देणारा आधार ठरतो. वर्षभर शेतीत रमणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रथमच थोडासा विसावा मिळालाय. पण, हा विसावाही शेतकऱ्यांना शिक्षा वाटते. कारण, खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे कामं करावीच लागणार आहेत.

- नितीन काळेल

.........................................................................