शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:57 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आवाहन

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाला वेळेत सुरुवात झाली, तर पश्चिम भागात सतत पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी कोयना धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०४ टीएमसीच्यावर गेला आहे.

सध्या धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.दरम्यान, कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता अत्यल्प राहिली असल्याने पाणी सोडताना पूर्व कल्पना देण्यास कालावधी मिळणार नाही. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या काठावरील सर्व लोकांनी काळजी घ्यावी.

सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज मोटारी, शेती अवजारे किंवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्यासह सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन कायेना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर