शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
2
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
3
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
4
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
5
PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट
6
Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक
7
२०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?
8
बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
9
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
10
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
11
जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन
12
Kojagiri Purnima 2024: कोजागरी विशेष 'हे' लक्ष्मी मंत्र; करतील कर्जमुक्त; वाचा हे विशेष तोडगे!
13
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला का खेळला जातो महाभोंडला? हा केवळ खेळ आहे की पुजा? वाचा!
15
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू
16
'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
17
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
19
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
20
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

कोयना धरण अखेर ‘फुल्ल’, विसर्ग सुरूच; सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By दीपक शिंदे | Published: September 21, 2022 4:36 PM

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

कोयनानगर (सातारा): महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण आज, बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तसेच धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.कोयना धरण बुधवारी दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचा पाणीसाठा १०५.२५ टीएमसी झाला आहे. पाणीपातळी २१६३.०६ फूट झाली असून, सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळेच ११ सप्टेंबरपासून पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. अजूनही तो विसर्ग सुरूच आहे; तर १३ सप्टेंबर रोजी सहा वक्री दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामध्ये वारंवार बदल करून पाणीपातळी नियंत्रित करण्यात आली.आज, पुन्हा दुपारी २ वाजता सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून ९४६३ क्युसेक व पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक असा कोयना नदीपात्रात एकूण १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला...कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या धरणातील पाणीसाठ्यावर या तिन्ही राज्यांचे लक्ष लागून असते. धरण पूर्ण क्षमतेने भरले की त्याचा तिन्ही राज्यांना फायदा होत असतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी