शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

Satara: डोंगरावर राहतो आम्ही; पर्वा कशाची!, नैसर्गिक संकटांकडे रहिवाशांचे दुर्लक्ष

By सचिन काकडे | Published: July 14, 2023 12:50 PM

‘माळीण’च्या घटनेतून बोध घेऊन पावसाळ्याचे दोन-तीन महिने तरी स्थलांतर करणे गरजेचे

सचिन काकडेसातारा : पावसाळा सुरू झाला असून, जिल्ह्यासह सातारा शहरात दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने कानावर येऊ लागल्या आहेत. असे असताना अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांना मात्र याचे कसलेच गांभीर्य नाही. कितीही पाऊस पडूदे, दरड कोसळू दे, जमीन खचू दे, पण आम्ही इथून हलणार नाही, अशी मानसिकता येथील रहिवाशांची झाली आहे.अलीकडे जमिनींना इतका भाव आला आहे की, सर्वसामान्य नागरिक स्वत:चं घर बांधण्याचं स्वप्नदेखील पाहूच शकत नाही. सातारा शहरातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ साताऱ्यात येणारी अनेक कष्टकरी कुटुंबं जिथे जागा मिळेल तिथे पत्र्याचं शेड उभं करून निवाऱ्याची व्यवस्था करतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत अजिंक्यतारा किल्ला, बोगदा व पॉवर हाऊस परिसरात अशा झोपड्या व घरांची रांग वाढू लागली असून, या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेचा ठरतो.पालिकेकडून अशा मिळकतदारांना धोक्याची कल्पना दिली जाते. पावसाळ्यात इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचनाही दिल्या जातात. मात्र, संबंधितांकडून या नैसर्गिक संकटाकडे दुर्लक्ष केले जाते. ‘आजवर काही झालं नाही, मग पुढे तरी काय होणार आहे?’ अशी मानसिकता येथील रहिवाशांची झाली आहे.

याचा धोका अधिक

  • अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड असून, ते पडण्याच्या मार्गावर आहे. मुसळधार पाऊस झाल्यास दगडांखालील मातीचे वहन होऊन हे दगड सैल होऊन खाली कोसळू शकतात.
  • वृक्षांची मुळे माती घट्ट धरून ठेवण्याचं काम करतात. मात्र, किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे मातीदेखील हळूहळू सैल होऊ लागली आहे.

ही काही उदाहरणे !

  • सात वर्षांपूर्वी अजिंक्यतारा किल्ल्यावरील एका घरावर महाकाय दगड येऊन आदळला होता. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, घराचे प्रचंड नुकसान झाले.
  • कोकण वसाहतीत असलेल्या एका घराचा पाया मोठ्या प्रमाणात खचला होता. हे घर पडता-पडता वाचले.
  • चार भिंती मार्गावरील गृहनिर्माण सोसायटीजवळ चार वर्षांपूर्वी दरड कोसळून घरांनी हानी झाली होती.

ही काळजी घ्याच !

  • ‘माळीण’ची घटना आठवली तरी आजही अंगावर शहारे उभे राहतात. या घटनेतून बोध घेऊन डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना किमान पावसाळ्याचे दोन-तीन महिने तरी नातेवाइकांकडे अथवा पर्यायी ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे. अन्यथा एखादे नैसर्गिक संकट ओढावल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन