शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
3
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
4
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
5
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
6
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
7
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
8
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
9
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
10
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
11
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
12
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
13
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
14
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
15
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
16
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
17
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
18
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
19
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
20
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण

‘जीवना’साठी जीव धोक्यात

By admin | Published: December 06, 2015 10:45 PM

आस कळशीभर पाण्याची : सक्ती धावता महामार्ग ओलांडण्याची

सातारा : पाणी ही माणसाची प्राथमिक गरज असल्यामुळेच त्याला ‘जीवन’ म्हटले गेले आहे. जगण्यासाठी आत्यंतिक गरजेचे हे पाणी मिळवण्यासाठी मात्र अनेकांना जीवही धोक्यात घालावा लागतो. हीच हतबलता महामार्गालगत असलेल्या झोपडपट्टीतील मुलींमध्ये आढळून आली आहे. कळशीभर पाण्यासाठी त्या रोज जीव धोक्यात घालत आहेत. वाढे फाटा ते शिवराज चौक असा महामार्ग शहराजवळून गेला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असतो. आता या रस्त्याचे सहापदरीकरण झाल्यामुळे तो ओलांडणे केवळ भुयारी मार्गाने किंवा उड्डाणपुलावरूनच शक्य होणार आहे. अजस्र वाहनांच्या प्रचंड वेगासमोर आलेल्या व्यक्तीच्या क्षणार्धात ठिकऱ्या उडतील हे माहीत असूनही काही जणांना मात्र हा धोका दररोज पत्करावा लागतो आहे.महामार्गावर अजंठा चौकानजीक झोपड्या वाढल्या आहेत. तेथील लहानग्या मुलींना कळशीभर पाण्यासाठी दररोज महामार्ग धोकादायक रीतीने ओलांडून जावे लागत आहे. झोपडपट्टीत पाण्याची व्यवस्था नसल्याने या मुली पाण्याने भरलेली कळशी किंवा हंडा डोक्यावर घेऊन जिवाची पर्वा न करता महामार्ग ओलांडत असून, हे भयावह दृश्य एखाद्या दिवशी अपघाताला निमंत्रण देऊ शकते. अजंठा चौकात वाढत असणाऱ्या झोपडपट्टीतील काही मुली पाण्यासाठी महामार्ग ओलांडून पलीकडे जातात. महामार्ग सोडल्यावर दोनशे मीटर अंतरावर एक कूपनलिका आहे. तिथे घागरी भरून या ओझ्यासह पुन्हा महामार्ग ओलांडतात. अनेकदा त्यांना वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नाही. मग त्यांची धावाधाव होते. वेगवान वाहनाचे ब्रेक लागले नाहीत, तर अनर्थ ओढवू शकतो.यावर्षी पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यात सर्वत्र गडद होत आहे. शहरांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणीकपात केली जात आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे पाणीपुरवठ्याची मूलभूत सुविधा उपलब्धच नाही, नळाचे कनेक्शन नाही, त्यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष जाणे दुरापास्तच आहे. तथापि, महामार्गावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे या चिमुकल्यांच्या कसरतीकडे लक्ष जाणार का, असा विचार हे दृष्य पाहणाऱ्याच्या मनात आल्याखेरीज राहत नाही. (प्रतिनिधी) गरजा पुरवणाऱ्यांच्या गरजा दुर्लक्षितशहरात श्रमाची गरज मोठ्या प्रमाणावर असते. ती पुरवण्यासाठी दूरदूरचे लोक शहरानजीक वस्ती करून राहतात आणि झोपडपट्ट्या वाढत जातात. मर्यादित उत्पन्नगटाच्या कुटुंबांना स्वस्त वस्तूंची गरज भासते. ही गरजही याच झोपड्यांमधील लोक पुरवतात. श्रम आणि स्वस्त वस्तू विकून पोटाची खळगी भरणाऱ्या या गोरगरिबांना मात्र प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. त्यांच्या झोपड्या ‘अनधिकृत’ असतात, हे सर्वज्ञात आहे; परंतु त्या ‘विनाकारण’ उभ्या राहिलेल्या नाहीत, एवढे तरी मान्य करावेच लागते. झोपड्यांमधील स्त्री-पुरुष कामासाठी दिवसभर बाहेर राहतात आणि पाणी आणण्यासारखी कामे घरातील लहान मुले-मुलीच करतात. प्राथमिक गरजेसाठी लहानग्यांचा जीव धोक्यात घातला जाणे भयावह आहे.