शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019 प्रभावशाली नेत्यांचा प्रचारात अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:30 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणुकांच्या प्रचारसभा गाजविणारे अनेक धुरंधर नेतेमंडळी ऐन लोकसभा निवडणुकीत ‘न्यूट्रल’ झाले ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : निवडणुकांच्या प्रचारसभा गाजविणारे अनेक धुरंधर नेतेमंडळी ऐन लोकसभा निवडणुकीत ‘न्यूट्रल’ झाले असल्याने त्यांचा अभाव जाणवताना पाहायला मिळत आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, शालिनीताई पाटील, बकाजीराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्या गैरहजेरीची चर्चा मतदार संघात जोरदार सुरू आहे.माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार शालिनीताई पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील आदी नेत्यांच्या प्रभावशाली भाषणांसाठी लोक गर्दी करत असत. एक काळ असा होता की या नेत्यांपैकी अनेकांना मुलूख मैदान तोफ ही बिरुदावली लावण्यात आली होती. आता हीच मंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात म्हणाव्या तितक्या प्रमाणात सक्रिय दिसत नाहीत.काहीजण केवळ हजेरी दिसण्यासाठी ठराविक सभांना येतात. मात्र, सातत्याने प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होताना कोणी दिसत नाहीत. कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँगे्रसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी कुणालाच दुखवायचे नाही, अशी भूमिका घेतलेली दिसते. माजी खासदार श्रीनिवास पाटील हे तर खासदार शरद पवार जेव्हा सातारा जिल्ह्यात सभा घेतात, त्याच व्यासपीठावर उपस्थित राहतात. इतर सभांना त्यांनी आपली हजेरी लावलेली दिसत नाही.शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांची नरेंद्र पाटील यांच्या प्रचारातील उपस्थिती तुरळक आहे. नितीन भरगुडे-पाटील हे लोणंद येथे उदयनराजेंच्या प्रचारासाठी झालेल्या सभेला गेले होते. त्यानंतर लोकांमध्ये मिसळून जो प्रचार करायला हवा, तो करताना ते दिसले नाहीत. खंडाळ्यातील ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांना शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते भेटून गेले. मात्र, पाटील हेही प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. पाटणचे नेते विक्रमसिंह पाटणकर हे उदयनराजेंच्या प्रचाराची मोठी सभा असेल तरच व्यासपीठावर पाहायला मिळतात.कोरेगावच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कोरेगावात मेळावा घेतला होता. मागील विधानसभा निवडणुकीत प्रलोभनाला भुललेल्या मतदारांमुळे आपला पराभव झाला, असा त्यांनी आरोप केला होता. आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात काम करत असताना खासदार उदयनराजे भोसले आपल्याला मदत करतील, असे शालिनातार्इंना वाटले होते. मात्र लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्या हातात-हात घालून प्रचार सुरू केल्याने शालिनीतार्इंचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा कोरेगाव तालुक्यात सुरू आहे.अलिप्त राहण्यामागे विधानसभेचे गणितखासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार झाडून कामाला लागले आहेत. आपापल्या सुभ्यात प्रचारफेऱ्या काढून उदयनराजेंना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने या आमदार मंडळींच्या विधानसभा प्रचाराची पहिली फेरी पार पडली आहे. आमदारांविरोधात त्या-त्या मतदार संघात विरोधाची लाट आहे. विधानभेची निवडणूक लढण्याची सुप्त इच्छा मनात असणारी मंडळी या निवडणुकीत अलिप्त आहेत. आपण जर या निवडणुकीत फिरलो तर या आमदार मंडळींनाच फायदा होऊन आपल्या अडचणी वाढतील, या भावनेपोटी व विधानसभेचे गणित डोक्यात ठेवून अनेकजण या निवडणुकीत अलिप्त राहिलेले पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक