शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

Lok Sabha Election 2019 : 'जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत उदयनराजेंशी समोरा-समोर बोलेन-नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:09 IST

लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत

ठळक मुद्देमिशी मर्दाची निशाणी; संसदेतील उपस्थिती आणि मांडलेल्या प्रश्नांबाबत केली विचारणासाताºयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही

सातारा : ‘लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत. आता मी २३ प्रश्न त्यांना विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्पष्ट केली नाहीत तर समोरासमोर बोलायलाही माझी तयारी आहे,’ असे जाहीर आव्हान शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पाटील म्हणाले, ‘उदयनराजेंनी संसदेत १० वर्षे खासदार म्हणून काम केलं. त्यांनी या काळात किती प्रश्न विचारले?, त्यांची संसदेतील हजेरी किती काळ होती?, जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्याकरिता त्यांनी किती तास चर्चेत सहभाग घेतला?, जीएसटी आणि नोटबंदीच्या विषयांवर ते टीका करत आहेत, मग या निर्णयांमुळे देशातील जनतेचे काय नुकसान झालं, याबाबत त्यांनी संसदेत मत मांडलं का?, त्यांनी खासदार निधीचा वापर नेमका कोणत्या तालुक्यात आणि किती केला?, दोन निवडणुका त्यांनी यापूर्वी जिंकल्या होत्या. त्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यातील किती गोष्टींची त्यांनी वचनपूर्ती केली? छत्रपती शिवाजी महाराजांचे ते थेट तेरावे वंशज असल्याचे सांगतात, मग प्रतापगडाची दुरवस्था दूर करण्यासाठी त्यांनी कोणती पावले उचलली?, साताºयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही?, आदी प्रश्न मी उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे उदयनराजेंनी द्यावीत.’

उदयनराजे भोसले दहा वर्षे खासदार होते. मात्र, त्यांचे कार्यालयही साताºयात नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर त्यांच्या राजवाड्याबाहेर जाऊन थांबावे लागते. त्यातूनही महाराज भेटतील, याची शक्यता अधांतरिच असते. सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. संसदेच्या माध्यमातून या शेतकºयांचे प्रश्न का सोडवता आले नाहीत?, राजवाड्यात अनेकदा चोºया झाल्या; पण एकाही चोरीबाबत खासदार उदयनराजेंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. जिल्ह्यातील एमएच ११ व एमएच ५० या आरटीओ रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनांना टोलनाका मोफत का केला नाही. जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांचे करोडो रुपये खासगी इन्व्हेस्टिंग कंपन्यांत अडकले आहेत, त्यांच्याबाबतही आवाज उठवला नाही. मात्र मी पुढच्या काळात हे प्रश्न धसास लावणार आहे. माझ्या प्रश्नांबाबत समोरासमोर चर्चेसाठी येण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.

 

खासदार झालो तर पूर्णवेळ जन्मभूमीसाठी

खासदार झाल्यानंतर मुंबईत राहणार की साताºयात ? या प्रश्नाबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘माझी कर्मभूमी मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा जिल्हा ही आहे. आमदार असताना या जन्मभूमीसाठी निधी दिला. त्यामुळे खासदार झालो तरी जास्तीत जास्त वेळ हा सातारा जिल्ह्यासाठीही देईन.’

नरेंद्र पाटील फोटो वापरावा

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले