शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

कलानगरला कमी दाबाने पाणी

By admin | Published: December 14, 2015 10:17 PM

कलानगरला कमी दाबाने पाणी

इंदिरानगर : कलानगरमध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. पाणीपुरवठा विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.कलानगरमध्ये अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढत आहेत. त्याचबरोबर नवनवीन समस्या उद्भवत आहे. यामध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा गंभीर समस्या बनली आहे. परिसरामध्ये सुमारे तीन वर्षांपासून ओंकार अपार्टमेंट, ओमेघा अपार्टमेंटसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. करंगळी इतकी बारीक धार नळास असल्याने पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही, तर वापरण्यासाठी आणायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पाणी येते तेव्हा महिलावर्गाची तारेवरची कसरत होते. पाणी भरले जात नाही म्हणून गेल्या चार महिन्यांपासून एक दिवसाआड स्वखर्चाने पाण्याचा टँकर मागविला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पाणीपुरवठा अधिकारी आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रार करून दखल घेतली जात नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त आशा शेट्टी, संध्या जावीर, राधिका बेलगावकर, विमला नाईक, शोभना कुलकर्णींसह महिलावर्गांनी दिला आहे. (वार्ताहर)