शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

महाबळेश्वर, पाचगणीमधील वीज, पाणीपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:42 AM

महाबळेश्वर : वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई बुधवारी चौथ्या दिवशी संपुष्टात आली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ...

महाबळेश्वर : वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई बुधवारी चौथ्या दिवशी संपुष्टात आली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाबळेश्वर व पाचगणी येथे वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला.

तौक्ते चक्रीवादळाचा महाबळेश्वर तालुक्याला मोठा फटका बसला होता. वादळामुळे वीज वितरण कंपनीचे कंबरडेच मोडले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले होते तर विजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटल्या होत्या. यामुळे वीजपुरवठ्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. शनिवारपासून शहराचा वीजपुरवठा बंद पडला होता. गेले चार दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न वीज वितरण विभागाकडून करण्यात येत होते. महाबळेश्वर व पाचगणी शहरास जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याचे पाणी पुरविले जाते. वीजपुरवठा खंडित झाल्याने या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा बंद पडला होता. वीजपुरवठा एक-दोन दिवसांत सुरू होईल, या अपेक्षेने प्राधिकरणाने पाणी पुरविण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शहरातील कृत्रिम पाणीटंचाईची साधी दखलही न घेतल्याने शहरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, पाणीटंचाईमुळे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला.