शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: उद्या ते मुंबईवरही दावा करतील - पृथ्वीराज चव्हाण

By प्रमोद सुकरे | Published: November 23, 2022 5:54 PM

गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी

कऱ्हाड : राज्याच्या दिशा बदलण्याचा अधिकार केंद्राच्या सभागृहाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सिमाप्रश्नाबाबत न्यायालयात दावे-प्रतिदावे आहेत. त्यामुळे सध्या कोण काय म्हणतय, याला महत्व नाही. महाराष्ट्राच्या सिमा निश्चितीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारा लढा आम्ही ताकदीनिशी लढू, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे सदस्य आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, अशोकराव पाटील, इंद्रजीत गुजर, प्रदीप जाधव, फारुख पटवेकर, इंद्रजीत चव्हाण, नितीन थोरात, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, झाकीर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यात न्यायीक लढाई कशी लढायची, याच्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर सिमाभागातील लोकांच्यावर जो अन्याय चालला आहे, त्याबाबत काय करायचे, याच्यावर चर्चा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचे ठरले आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगत आहेत, याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, उद्या ते मुंबईवरही दावा करतील. मात्र, ही न्यायीक लढाई  आहे. महाराष्ट्राने याबाबत २००४ साली सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर त्यावर २०१४ मध्ये कर्नाटकने पुन्हा नवा दावा दाखल केले आहे. कर्नाटकने केलेल्या दाव्यामध्ये सिमाप्रश्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्राच्या पार्लमेंटला आहे, असे म्हटले आहे.  त्यामुळे २०१४ च्या दाव्याचा निकाल लागल्याशिवाय मुळच्या दाव्यावर विचार होऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. मात्र, आमची समिती न्यायालयीन लढाई पुर्ण ताकदीने लढेल.गुजरात निवडणुकीच्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी आहे. आप तेथे मोठ्या प्रमाणात उतरला असला तरी तेथे खरी लढत ही काँग्रेस व भाजपमध्येच आहे. भाजपची तेथे सलग २७ वर्ष सत्ता आहे. ती बदलण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

भाजपने खरा शोध घेऊन उत्तरे द्यावीतराहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, इतिहास पुरूषांकडे ऐतिहासीक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्या दोन्ही बाजु तपासल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सावरकरांना माफीवीर असे म्हटले. त्यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी पुरावा मागीतल्यावर त्याचा त्यांनी पुरावाही दिला. आता त्यावर नाहक चर्चा न करता भाजपने खरा शोध घेऊन त्याची उत्तरे द्यावीत... अन् बाबांनी कोपरापासून हाथ जोडले!राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी कोपरापासून हाथ जोडले. राज्यपाल कोश्यारी हे मुद्दाम वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. त्यांना पुन्हा हिमाचलमध्ये मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी वक्तव्ये केल्यानंतर ते परत पाठवतील, असे त्यांना वाटत असावे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची मुख्यमंत्री करणार उद्घाटनेशुक्रवार, दि. २५ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कºहाडात येत आहेत. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, नविन विश्रामगृहाचे उद्घाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली व रेठरे नवीन पुलाचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते आयोजीत केले असल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण