शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

सातारला शरद पवारांच्या प्रभावाची महायुतीतील नेत्यांना धास्ती! नेत्यांच्या मनोगतातून कार्यकर्त्यांनाही जाणीव

By प्रमोद सुकरे | Updated: April 10, 2024 08:42 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली, पुतण्यासह राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह महायुतीच्या सोबत असले तरी थोरल्या पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावाची धास्ती मात्र आजही महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी कराडात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातही दिसून आले. 

-  प्रमोद सुकरे कराड - सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. सातारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. सातारा जिल्हा तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली, पुतण्यासह राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह महायुतीच्या सोबत असले तरी थोरल्या पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावाची धास्ती मात्र आजही महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी कराडात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातही दिसून आले. 

एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता .पण सन १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.अन हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कधी झाला हे कोणालाही कळाले नाही. जिल्ह्यातील अपवाद वगळता सगळे आमदार, खासदार राष्ट्रवादीचे, जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य संस्थांवरही पवारांचा प्रभाव दिसून आला.

गत लोकसभा निवडणुकीतही उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर सातारची जागा लढवली आणि ते खासदार झाले. पण ४ महिन्यातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला हे समजले नाही.या मतदारसंघात पोट निवडून झाली मात्र त्यानंतर राजेंनी पुन्हा भाजपचे कमळ हातात घेऊन मैदानात उडी मारलीच. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी त्यांचे विजयाचे काटे उलटे फिरवले. मग भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर संधी दिली हा तसा ताजाच इतिहास आहे.

सध्या उदयनराजे भोसले राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाल अजून बराच बाकी आहे. पण त्यांना लोकसभेची आस आहे. त्यामुळेच पुन्हा ते भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठीकठिकाणी मेळावे सुरू आहेत. असाच एक महायुतीचा मेळावा मंगळवारी कराडात झाला. महायुतीचे अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित होते. पण अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना पवारांच्या प्रभावाची धास्ती घेतल्याचे दिसून आले.

दस्तूरखुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आपण काहीही म्हटले तरी जिल्हा हा 'जाणत्या राजाला' मानणारा जिल्हा आहे. या मतदारसंघातील माणसं ही काही विचाराशी बांधली गेलेली आहेत. तेव्हा त्यांना त्या विचारापासून बाजूला करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार इथे निवडून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्याला उमेदवारी मिळेल त्याने सूक्ष्म नियोजन करून प्रचाराची गती वाढवावी लागेल.

'पवार भिजले, वातावरण फिरले'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही आपल्या भाषणात गत लोकसभेच्या आठवणींना उजाळा दिला. प्रचार सभेदरम्यान आलेल्या पावसात 'शरद पवार भिजले आणि सगळे वातावरण फिरले' असे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यातील शरद पवारांच्या प्रभावाची अप्रत्यक्ष त्यांनी आठवणच करून दिली.

त्यात यांनी वाढवली डोकेदुखीमहायुतीच्या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी शरद पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावावर वक्तव्ये केली.तो प्रभाव कमी करुन विजयाप्रत जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पण महायुती बरोबर असणार्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने, दांडी मारल्याने महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपा