शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

प्रमुख बँकांना उद्या कडक पोलिस बंदोबस्त

By admin | Published: November 09, 2016 10:56 PM

अश्विन मुदगल : आपली बँक व्यवस्था सक्षम; ३0 डिसेंबरपर्यंत बँक, पोस्ट कार्यालयात पैसे जमा करण्याचे आवाहन

 सातारा : ‘पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला या निर्णयामुळे काही दिवस थोडी तसदी सोसावी लागणार असली तरी कोणाच्याही भूलथापांवर विश्वास न ठेवता आपल्याकडच्या पाचशे व हजारांच्या नोटा बँका, पोस्ट कार्यालयांतच जमा करा. यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जिल्हावासीयांना केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी तत्काळ जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स, पेट्रोल पंप असोसिएशन, व्यापारी असोसिएशन तसेच विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बुधवारी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, स्टेट बँक आॅफ इंडियाचे प्रबंधक राजीव प्रसाद, आयडीबीआय बँकेचे प्रबंधक अनिल गोडबोले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई आदींसह प्रमुख बँकर्स उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. पेट्रोल पंप, औषध विक्री दुकाने या ठिकाणी जनतेला वेठीस धरण्यात येऊ नये, त्यांच्या गरजा भागवाव्यात. गुरुवारपासून बँका व पोस्ट कार्यालयांमधून नोटांची बदली अथवा भरणा सुरू करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांना दोन हजार रुपयांची मर्यादित रक्कम गरजेपुरती काढता येईल. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कुठेही ५०० किंवा १००० च्या नोटा बदलताना अडचण येणार नाही. पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांना सहकार्य करावे. ५०० रुपयांच्या नोटा या ठिकाणी घेता येणार असल्याने त्यांनी तसा फलक आपल्या पंपावर लावावा. बँकांना १००, ५०, २०, १० अशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. ज्या बँकांच्या शाखा जिल्ह्यात सर्वदूर आहेत, तेथील शाखांमध्ये सुट्या पैशांची अडचण भासू देऊ नका, अशा सूचना बँक अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जनधन योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ९८ टक्के लोकांची खाती काढली आहेत. या खात्यांमध्ये लोकांना ५०० व १००० च्या नोटा जमा करता येतील. तसेच बँकांमधील सेव्हिंग, करंट खात्यांमध्येही पैसे जमा करता येणार आहेत. ५० दिवसांची यासाठी मुभा असल्याने नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, गोंधळलेल्या परिस्थितीत काही समाजविघातक मंडळी पैसे बदलून देतो, अशी फसवणूक करण्याची शक्यता आहे. अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये. शासनाने काळा पैसा जमा करणाऱ्यांवर या माध्यमातून चाप बसवला असून, याचे दूरगामी परिणाम आपल्या सर्वांना काही दिवसांत जाणवतील. त्यामुळे या निर्णयाचे आपण सर्वांनीच समर्थन करायला हवे, असेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शाखांमार्फत ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणूस हाच प्रथम प्राधान्य ठेवून उद्या व्यवहार करावेत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे म्हणाले, ‘बँकर्स आणि नागरिक यांनी कोणतीही