शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
2
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
3
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
4
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
5
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
6
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
7
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
8
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
9
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
10
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
11
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
12
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
13
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
14
Jio, Airtel, Vi चे रिचार्ज प्लॅन्स होऊ शकतात स्वस्त, सरकारकडे केली मागणी; काय आहे प्रकरण?
15
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
16
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
17
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
18
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
19
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
20
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

सांडपाण्यावरील परसबागेतील आमराई मोहराने फुलली, मान्याचीवाडी ग्रामस्थांचा अनोखा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 4:14 PM

रवींद्र माने ढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले ...

रवींद्र मानेढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले आहे. गावातील सांडपाण्यावर लावलेल्या परसबागांमध्ये लागवड केलेल्या आंब्याच्या बागा मोहराने फुलल्या आहेत. यावर्षी आंब्याचे विक्रमी उत्पन्न मिळेल, असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसू लागल्याने मान्याचीवाडी येथील काही शेतकऱ्यांनी बांधावर तर काहींनी शेतात फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. बहुतेक शेतकऱ्यांनी गाव परिसरात वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचा पुर्नवापर करण्याचा निर्धार केला.त्यानुसार आंबा, चिक्कू, शेवगा, लिंबू, साग, फणस आदी फळझाडांची निवड केली. त्यासाठी गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटाराच्या बाजूला असलेल्या शेतजमिनीची निवड केली. त्यामध्ये ही वृक्षलागवड केली. घरातील आंघोळीचे, धुण्या-भांड्याचे बंदिस्त गटारांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी थेट या झाडांना न देता गटारमध्ये स्क्रिनिंग चेंबर घेऊन शुद्ध पाणी बागेतील फळझाडांना दिले.गावातील सांडपाणी कुठेही ओढ्याला अथवा नदीला न सोडता त्याचा पुनर्वापर करत येथील शेतकऱ्यांनी परसबागा फुलवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडलीच शिवाय सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण टाळण्यासही मदत झाली. सांडपाण्यावर आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादित केलेल्या येथील आंबा, चिक्कू आणि लिंबू या फळांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे येथील शेतकरी सांगतात.यावर्षी चिक्कूही मोठा भाव खाऊन गेला, तर येणारा आंबा हंगाम भरभराट करून जाईल, असा अंदाज असून, सांडपाण्यावर तयार केलेल्या परसबागा मोहराने फुलल्या आहेत.

विजेशिवाय वृक्ष जतनगावातील सांडपाणी बंदिस्त गटाराद्वारे दोन ठिकाणी वाहून जाते. त्याच मार्गावर या फळबागांचे नियोजन केले आहे. तेथे शेतकरी आपापल्या बागांना आळीपाळीने पाणी देतात. त्यामुळे विजेशिवाय वृक्षलागवडीचा यशस्वी प्रयोग मान्याचीवाडीत यशस्वी झाला आहे.

माझी वसुंधरा अभियानातही वृक्षलागवड...ग्रामस्थांनी दिवंगतांच्या स्मरणात तसेच महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण तसेच नवदाम्पत्यांनी नवीन संसाराची सुरुवात वृक्षारोपणाने करावी, असे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी केले आहेत. यावर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गतही बांधावरची वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

सांडपाणी हे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्याची विल्हेवाट न लावल्यास प्रदूषण होऊन साथीच्या आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी प्रत्येक गावाने सांडपाण्याचे नियोजन तसेच त्यासाठी भूमिगत गटार व्यवस्था करायला हवी. सांडपाण्याचा पुनर्वापर केला तर उत्पन्नही मिळू शकते. - दिलीप गुंजाळकर, माजी उपसरपंच, मान्याचीवाडी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर